शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

प्लास्टिकचा खच, प्रक्रिया शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:35 IST

संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवमानना चालविल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था : जप्त प्लास्टिकचा साठा धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवमानना चालविल्याचा आरोप होत आहे.२३ जूनपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिकबंदी करण्यात आली. तत्पूर्वी सर्व नियोजन प्राधिकरणने व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक प्रक्रिया केंद्रे उभारावित, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तसे शपथपत्र राज्य सरकारने न्यायालयात दाखल केले. त्यानंतर संपूर्ण प्लास्टिकबंदी अमलात आणली गेली. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा, विक्री, वितरणावर बंदी आणली. अमरावती महापालिकेनेही आतापर्यंत ६०० किलोच्यावर प्लास्टिकसाठा जप्त केला. याशिवाय कारवाई नको म्हणून व्यापारी, नागरिक व अन्य घटकांनी प्लास्टिक कचऱ्यात फेकून दिले. परिणामी दररोज निघणाºया २०० ते २५० टन कचºयामध्ये ६० ते ७० टक्के प्लास्टिकचा कचरा निघू लागला. प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू नसल्याने शहरातील संकलित केलेला प्लास्टिक कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. पर्यावरण विभागाने याकडे दुर्लक्ष चालविले असून, प्लास्टिकबंदीशी आपले काय देणे-घेणे, या मानसिकतेतून प्लास्टिकबंदीचा विषय आरोग्य व स्वच्छता विभागाकडे ढकलण्यात आला आहे. सुकळी कंपोस्ट डेपोतील प्लास्टिक प्रक्रिया केंद्र विविध कारणांनी पावणेदोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे प्लास्टिक कचºयाचा प्रश्न पेटण्याचे संकेत आहेत.पर्यावरण अधिकारी कारवाईपासून दूरसुकळीचा प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटचा लाभ शून्य आहे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरही तो प्रकल्प अधिक वेगाने कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त पर्यावरण अधिकाºयांना याबाबत जाब विचारतील काय? की हेमंत पवारांप्रमाणे निपाणेही त्यांना पाठीशी घालणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी