शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

‘स्वच्छ’ कामगिरी बजावा अन्यथा अनुदानाला ब्रेक!; पालिका, महापालिकांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:22 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे कचरा विलगीकरण अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यात येणार आहेत. नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब केले असून कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाºया शहरांच्या अनुदानाला ब्रेक लावण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानात समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता देशभरातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ राबविण्यात येत आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येणार आहे. मात्र या अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करताना काही शहरांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण राज्य सरकारने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमिवर अशा शहरांना योग्य गतीने कार्यप्रवण करण्यासाठी आणि अन्य शहरांना उद्दिष्ट्य साध्य करण्यास चालना मिळावी, यासाठी ‘अनुदान’ थांबविण्याची कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमिवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत एप्रिल २०१८ अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किमान ८० टक्के कचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे अनिवार्य केले आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये चांगला गुणानुक्रम मिळविणे अनिवार्य आहे. निर्मितीच्या जागीच विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून एप्रिल २०१८ अखेरपर्यंत केंद्रीय पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी तंबीच नगरविकास विभागाने महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना दिली आहे. या तीनही घटकांवर सकारात्मक काम न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनस्तरावरून प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनुदान थांबू नये, यासाठी या संस्थांना ‘काम’ करून दाखविण्याचे आव्हान एप्रिलपर्यंत पेलायचे आहे.कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाऱ्या व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या ‘यूएलबी’ची प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.- सुधाकर बोबडे, उपसचिव, महाराष्ट्र शासन

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान