शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्र सरकार सुस्त-जनता कोरोनाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 9:08 AM

कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. 

ठळक मुद्देनिष्क्रिय महाराष्ट्र सरकार बरखास्त करा व महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली.  महाराष्ट्र व विदर्भाला तसेच अमरावती जिल्ह्याला पुन्हा भरीव मदत करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.कोरोनाच्या या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांना मानाचा मुजरा करून, या लढ्यात ज्या कोरोना योद्ध्यांनी आपले प्राण गमावले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून राणा यांनी स्वत:च्या अनुभवावरून आपबीती लोकसभेत मांडली.रविवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होऊन त्यांनी अत्यंत भावुक पण तेवढेच वस्तुनिष्ठ व मार्मिक विवेचन स्वानुभवावरून केले. आपण, आपले पती आमदार रवी राणा व संपूर्ण कुटुंबातील 18 सदस्य या अग्निदिव्यातून गेलो असून कोरिनाग्रस्तांच्या सर्व समस्या अनुभवल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयावह आहे. बेड-व्हेंटिलेटर-आॅक्सिजन-मास्क-इंजेक्शन आदींचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णांना बेड नाही हॉस्पिटलची संख्या कमी आहे. उपचाराअभावी अनेक रुग्ण तडफडून प्राण सोडत आहेत. खाजगी दवाखान्यांची अधिग्रहण मर्यादा 10% वरून 50%करावी व नागरिकांची सोय करावी अशी मागणी त्यांनी पुढे केली.सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावावर प्रचंड लूट सुरू असून एकेका रुग्णाकडून 2 ते 12 लाख रुपये लुटले जात आहेत. केंद्र सरकारने आकस्मिक कायदा लागू करून या रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी व गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

सध्या विदर्भात ऑक्सिजन चा प्रचंड तुटवडा असून केंद्रीय आरोग्य विभागाने आयनॉक्स नावाच्या कंपनीला पश्चिम विदर्भात  5 जिल्ह्यांमध्ये रोज एक ऑक्सिजन टँकर पुरविण्याचे निर्देश द्यावे असा आग्रहही त्यांनी केला. सध्या या आजारासाठी उपयुक्त असणारे रेमेडीसिवर व इंजेक्शन काळ्या बाजारात विकून रुग्णांना हजारो रुपयांची लूट केली जात आहे यामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.

सरतेशेवटी आपबीती मांडताना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील उद्रेक त्यांनी सभागृहात मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीत बसुन 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' ची घोषणा करतात पण माझा महाराष्ट्र -माझी जबाबदारी असे मात्र म्हणत नाहीत. त्यांनी 80 वर्षांचे योद्धा शरद पवार साहेब यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात फिरावे असा आग्रहही केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा