शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोन पाचवीला पुजलेला, प्रत्येक घर आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 10:49 IST

Amravati : मेळघाटातील शुद्ध पेयजलाची व्यवस्था आहे कुठे? ; जनुन्यात अनेकांनी गमावले प्राण

अमरावती : क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोन होऊन तडफडत प्राण गमावणे हेच जनुनावासीयांचे विधिलिखित असावे, अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आजाराने प्रत्येक घरातील सदस्य ग्रासलेला आहे, तर अनेकांनी प्राण गमावले आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मेळघाटातील प्रत्येक गावात काही गोष्टी समान आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आणि शुद्ध पेयजल नसणे हे त्यापैकी प्रमुख.

मेळघाट हे आधीपासूनच अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याच मेळघाटात असणारे, पण अचलपूर तालुक्याच्या टोकावरील जनुना हे गाव जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे. या गावात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा स्रोत म्हणजे भूगर्भातील क्षारयुक्त पाणी. विहिरीतून ओढून घागरीत आणि थेट घशात. ना तपासणी, ना फिल्टर. यामुळे गेल्या काही वर्षांत या गावातील अनेक जण मूत्राशयाचा विकार बळावल्याने दगावले आहेत. आजदेखील गावात अनेकजण आजारी आहेत.

जनुना गावातील या गंभीर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता, या गावातील प्रत्येक घरात मूत्राशयाचा विकार असलेले रुग्ण आहेत. शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धेमुळे गावातील अनेकांनी आपल्याला होणाऱ्या वेदना, आपला आजार यासंदर्भात कुठल्याच तपासण्या केल्या नाहीत. मात्र, असह्य वेदनेने घरातच विव्हळणारे अनेक जण या गावात पाहायला मिळतात. यापैकी काही रुग्ण स्वत:हून पुढे अकोल्याच्या डॉक्टरांकडे, तर काही रुग्ण परतवाडा आणि अमरावती येथील डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.

गावात आरोग्य केंद्रच नाही

परतवाडा-अकोला मार्गावर असणाऱ्या पथ्रोट गावापासून १८ किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर जनुना हे गाव आहे. शहानूर धरणापासून उंचावर सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. गावामध्ये कुठलाही दवाखाना नाही. गावातील रुग्णांना उपचारासाठी पथ्रोट हे गावच गाठावे लागते. 

सहा महिन्यांपासून डायलिसिसक्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रपिंडाचा विकार झाल्यामुळे सुरेश महारनार हा २८ वर्षीय तरुण डायलिसिसवर आहे. त्याने अकोला येथील डॉक्टर भुसारी यांच्याकडे उपचार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून परतवाडा येथील तालुका रुग्णालयामध्ये त्याच्यावर डायलिसिस केले जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्यात क्षार असल्यामुळे माझ्यासह अनेकांची अशी अवस्था झाल्याचे सुरेश महारनार याने सांगितले.

काय झाले शुद्ध पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाचे?शहानूर धरणातील पाणी दीडशे किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या खारपाणपट्ट्यातील २३५ गावांना पुरविले जाते. ते पाणी दर्यापूर भातकुली तालुक्यात जात असताना धरणापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जनुना गावात पोहोचत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दोन वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळून आल्यावर पिण्याचे शुद्ध पाणी गावात पुरविले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत गावात पिण्यायोग्य पाणी मिळाले नाही. 

टॅग्स :Melghatमेळघाटwater scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषण