शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी

By गणेश वासनिक | Updated: October 12, 2023 15:55 IST

जनजाती सल्लागार परिषदेत निर्णय, स्वतंत्र आयोग स्थापनेलाही मान्यता

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली जनजाती सल्लागार परिषदेची ५१ वी बैठक मंत्रालयात बुधवारी पार पडली. या बैठकीत अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करुन अंतिम आराखडा तयार होणार आहे.

गेल्या ३८ वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात आदिवासी समाजाच्या चळवळीत अग्रगण्य 'ट्रायबल फोरम' या संघटनेने वारंवार शासनाला पत्रव्यवहार करुन मागण्या केल्या होत्या. तर आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्नासंदर्भात 'लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.

भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचितील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी आहेत. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र राज्यासाठी १९५० आणि १९६० साली अनुसूचित क्षेत्र घोषित केले होते. तेच अनुसूचित क्षेत्र पुन्हा २ डिसेंबर १९८५ साली निश्चित करुन घोषित केले. मात्र ३८ वर्षे लोटून गेली तरी अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नव्हती, हे विशेष.

विदर्भातील आदिवासींवर अन्याय

राज्यात १९८५ ला अनुसूचित क्षेत्रातील गावे घोषित करण्यात आली. ती अधिसूचना सन १९७१ च्या जनगणनेतील माहितीवर आधारित होती. विदर्भातील आदिवासीबहुल गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींची लोकसंख्या असतानाही आदिवासींची लोकसंख्या नसल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे १९८५ च्या अधिसूचनेत विदर्भातील या सहा जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राचा समावेश आढळत नाही. यामुळे विदर्भातील आदिवासींवर अन्याय झाला आहे.

राष्ट्रपती एखादे गाव अनुसूचित क्षेत्रातून वगळत नाही. तोपर्यंत त्या गावातील उमेदवारांना नोकरीसह सर्व लाभ मिळाले पाहिजे. अनुसूचित क्षेत्रातील नोकर भरती झालेली नाही. राज्यपालांनी वास्तव्याच्या अट संदर्भात नवीन अधिसूचना काढली पाहिजे. तसेच पेसा क्षेत्रातील नोकरभरतीसाठी स्वतंत्र कायदा करायला हवा. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आदिवासी समाजाकडून कौतुक होत आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावती