शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी

By गणेश वासनिक | Updated: October 12, 2023 15:55 IST

जनजाती सल्लागार परिषदेत निर्णय, स्वतंत्र आयोग स्थापनेलाही मान्यता

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली जनजाती सल्लागार परिषदेची ५१ वी बैठक मंत्रालयात बुधवारी पार पडली. या बैठकीत अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करुन अंतिम आराखडा तयार होणार आहे.

गेल्या ३८ वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात आदिवासी समाजाच्या चळवळीत अग्रगण्य 'ट्रायबल फोरम' या संघटनेने वारंवार शासनाला पत्रव्यवहार करुन मागण्या केल्या होत्या. तर आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्नासंदर्भात 'लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.

भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचितील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी आहेत. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र राज्यासाठी १९५० आणि १९६० साली अनुसूचित क्षेत्र घोषित केले होते. तेच अनुसूचित क्षेत्र पुन्हा २ डिसेंबर १९८५ साली निश्चित करुन घोषित केले. मात्र ३८ वर्षे लोटून गेली तरी अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नव्हती, हे विशेष.

विदर्भातील आदिवासींवर अन्याय

राज्यात १९८५ ला अनुसूचित क्षेत्रातील गावे घोषित करण्यात आली. ती अधिसूचना सन १९७१ च्या जनगणनेतील माहितीवर आधारित होती. विदर्भातील आदिवासीबहुल गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींची लोकसंख्या असतानाही आदिवासींची लोकसंख्या नसल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे १९८५ च्या अधिसूचनेत विदर्भातील या सहा जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राचा समावेश आढळत नाही. यामुळे विदर्भातील आदिवासींवर अन्याय झाला आहे.

राष्ट्रपती एखादे गाव अनुसूचित क्षेत्रातून वगळत नाही. तोपर्यंत त्या गावातील उमेदवारांना नोकरीसह सर्व लाभ मिळाले पाहिजे. अनुसूचित क्षेत्रातील नोकर भरती झालेली नाही. राज्यपालांनी वास्तव्याच्या अट संदर्भात नवीन अधिसूचना काढली पाहिजे. तसेच पेसा क्षेत्रातील नोकरभरतीसाठी स्वतंत्र कायदा करायला हवा. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आदिवासी समाजाकडून कौतुक होत आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावती