शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पॅसेंजर गाड्या कायम बंद करण्याचा घाट? गरीब,सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:16 IST

भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे.

 - गणेश वासनिक

अमरावती - भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. १ जानेवारी २०१९ पासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्यांमुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे हाल होत असून, आर्थिक फटकादेखील बसत आहे. सहा रेल्वे पॅसेंजर बंद असल्याची माहिती आहे.पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे कमी असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: अकोला, नागपूर, शेगावकडे ये-जा करण्यासाठी पॅसेंजर गाडीला अधिक पसंती दिली जाते. मात्र, भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे आणि पावसाळ्यापूर्वी पुलांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्यात. परंतु, सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही पॅसेंजर गाड्या सुरु होत नसल्याने बहुतांश प्रवाशांना एसटी अथवा महागड्या रेल्वेच्या एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला आर्थिक उत्पन्न मिळत असताना बंद करण्याचे कारण हे गुलदस्त्यात आहे. लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाड्यांचे थांबे असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांसाठी ते सोईचे ठरत होते. मात्र, जानेवारीपासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या जुलै महिना संपण्याकडे वाटचाल सुरू झाली असताना, त्या सुरू होत नसल्याचे चित्र आहे.     या सहा पॅसेंजरच्या फे-या बंद भुसावळ ते नागपूर दरम्यान सहा पॅसेंजर गाड्यांच्या फेºया बंद करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ-वर्धा, अमरावती-नागपूर, वर्धा-भुसावळ,  भुसावळ-वर्धा, नागपूर-अमरावती, वर्धा-भुसावळ अशा सहा फेºया बंद झाल्या आहेत. नरखेड-भुसावळ आणि अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू आहे. अमरावती-बडनेरा लोकलसुद्धा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह गरीब, कामगारांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

 प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमजानेवारीपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. 

नागपूर-भुसावळ दरम्यान बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना निवेदन देण्यात आले आहे. ही मागणी दैनंदिन प्रवासी वर्गांनी आधीच केलेली आहे. बंद पॅसेंजर का सुरू झाल्या नाहीत, यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू.- नवनीत रवि राणा, खासदार, अमरावती     काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर कामे अद्यापही सुरूच आहेत. दरदिवसाला दोन ते तीन तासांचे ब्लॉक होत आहेत. अद्यापपर्यंत बंद पॅसेंजर गाड्यासंदर्भात निर्णय झाला नाही.      - पी.के. सिन्हा   प्रबंधक, रेल्वे स्थानक बडनेरा.     पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. सहा महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे बस किंवा महागडा प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या सुरुव्हाव्यात.    - रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती