शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत.

ठळक मुद्देदिवसाला ३५ हजारांचे उत्पन्न : दररोज धावतात २५ बस

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गरिबांचा रथ मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे कोरोनामुळे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. ग्रामीण भागात तीन आठवड्यांपासून बससेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची त्याकडे पाठ आहे. दिवसाला फक्त ३० ते ३५ हजारांचे उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक माहिती महामंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.जिल्ह्यातून पूर्वी दिवसाला ४०५ एसटी बस धावायच्या; आता फक्त २५ बसेस ग्रामीण भागात धावत आहेत. एसटीला प्रतिदिन ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत. त्यातच अमरावती व बडनेरा क्षेत्रात एसटीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याकारणानेही एसटीच्या उत्पन्नाला फटका बसत आहेत.अमरावती शहराकरिता बससेवा सुरू झाल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. सद्यस्थितीत ग्रामीण भागात २५ बस अडीच ते तीन हजार किमीचा प्रवास करीत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनच्या पूर्वी प्रतिदिन एक ते दीड लाख किमी बस अंतर कापायच्या त्यातून ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. आत ते उत्पन्न ठप्प झाले आहे. दर्यापूर, परतवाडा, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, मोर्शी, वरूड या आगारांतून सद्यस्थितीत बससेवा सुरू असून अमरावती वगळता जिल्ह्याच्या सीमारेषांपर्यंत त्यांच्याकडून प्रवाशांची ने-आण होत आहे.तीन आठवड्यांपासून प्रवाशांची संख्या वाढली नाही. बस कमी करण्यात आल्या. आता २५ बसेस धावत आहेत. अडीच हजार किमीचा प्रवास होत असून प्रतिदिन ३५ हजाराचे उत्पन्न येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रक अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक