शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित शाळाप्रवेशासाठी पालकांचा आरटीई घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

संबंधित पालकांनी सादर केलेल्या पत्त्यावर रहिवाशी आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याचे निर्देश सीइओंनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार २८ पालकांच्या रहिवासी पत्त्याची यापूर्वी तपासणी करण्यात आलेली आहे. संबंधिताना कल्पना न देता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीव्दारे २१ आॅगस्टला शहरानजीकच्या गावात व तेथून जवळच असलेल्या नामांकित शाळेत प्रत्यक्ष जावून चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देदस्तऐवजांवर संशय : सीईओंचे करविली चौकशी

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या पात्र ठरलेल्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया शाळास्तरावर सुरू आहे. यामध्ये नामांकित शाळेत प्रवेशासाठी रहिवाशाचे खोटे करारनामे दाखवून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न काही पालकांनी केला आहे. सीईओ अमोल येडगे यांनी करविलेल्या चौकशीत पालकांचा हा घेटाळा उघड झाला आहे.संबंधित पालकांनी सादर केलेल्या पत्त्यावर रहिवाशी आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याचे निर्देश सीइओंनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार २८ पालकांच्या रहिवासी पत्त्याची यापूर्वी तपासणी करण्यात आलेली आहे. संबंधिताना कल्पना न देता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीव्दारे २१ ऑगस्टला शहरानजीकच्या गावात व तेथून जवळच असलेल्या नामांकित शाळेत प्रत्यक्ष जावून चौकशी करण्यात आली. यामध्ये १० पालकांनी घरमालकांचे करारनामे जोडले असले तरी ते संबंधित ठिकाणी राहत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीई प्रवेश घेण्यासाठी जोडलेले रहिवाचे पुरावे हे संशयास्पद असल्याचे सीईओंकडे सादर केलेल्या या चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले. या कारनाम्यासाठी संबंधित पालकांना नोटीस बजाविण्याचे आदेश सीईओंनी शिक्षण विभागाला दिले आहेत.संबंधित पालकांनी त्यांच्या रहिवासी पुराव्याचे ठोस दस्ताऐवज सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या पालकांना २८ ऑगस्टपर्यत लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे. समाधानकारक ऊत्तरे नसल्यास संबंधित पाल्याचे प्रवेश रद्द करून दोषी पालकांवर प्रशासनाकडून कारवाईसुध्दा केली जाणार आहे.दुर्बल घटकांसाठी सोयमागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालकांच्या शिक्षण हक्क कायद्याने (आरटीई) खासगी शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे अनिवार्य आहे. त्यानुसार सन २०२०-२१ या वर्षातील शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात २४२ शाळांमध्ये २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ४५६ विद्यार्थी या सोडतीमध्ये प्रवेशास पात्र ठरले आहेत. या सर्वाना तस्े मॅसेज देखील पाठविण्यात आलेले आहेत.अद्याप २३५० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. कागदपत्रांची पडताळणी शाळा स्तरावर केली जात आहे. २५ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रवेशाचे संपूर्ण नियंत्रण सोपविण्यात आले आहे.शाळा प्रवेशासंदर्भात संदेश आल्यानंतर त्या दिनांकाला सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित राहून व कागदपत्रांच्या पडताळणीचे अधीन राहून तात्पुरता प्रवेश घेवूण शाळेत हमीपत्र द्यावे लागत आहे.शाळेच्या संदेशावर विसंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाला याची खात्री करावी, असे सांगण्यात आले. पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळली किंवा आरटीई पोर्टलवर चुकीची माहिती भरली असल्यास कारवाई करण्याचे शिक्षण संचालनालयाने निर्देश आहेत.दरम्यान आरटीई प्रवेशाचा लाभ गरजूनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये चूकीची माहिती सादर करून लाभ घेतल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अमोल येडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.- तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालकांवर, घरमालकांवर कारवाईआरटीई प्रवेशप्रक्रियेत रहिवासी पुराव्यासाठी घरमालकांसोबत करारनामा केल्याचे दर्शवून प्रत्यक्ष तेथे पालक राहत नसल्याचा संशय आहे. त्यासंबंधाने विशेष पथकाने दोनवेळा नजीकच्या गावात खातरजमा केली. दहा पालक ांनी जोडलेले रहिवासी पुरावे संशयास्पद असल्याने त्यांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. घोटाळा उघड झाल्यास प्रवेश रद्द करून पालकांवर, घरमालकांवर कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.शाळास्तरावर पडताळणीशिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया यंदा कोरोना संकटामुळे शाळा स्तरावर राबविली जात आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेश अर्जासोबत जोडण्यात आलेल्या दस्तऐवजाची पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने विद्यार्थ्याना नामांकीत शाळेत प्रवेश दिले जात आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा