शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

धार्मिक दीक्षा देण्यासाठी आई-वडिलांची बळजबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:39 PM

आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.

ठळक मुद्देमुलीचा गौप्यस्फोट : बेपत्ता मुलीचा शिरखेड पोलिसांनी लावला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.रिद्धपूरनजीकच्या ब्राह्मणवाडा (दिवे) येथे स्थित असलेल्या महानुभाव पंथ आश्रमातील रहिवासी सन्याशी गोपालमुनी उर्फ अवेराजबाबा शेवतकर आणि तपस्विनी रत्नाताई शेवतकर यांची दत्तक कन्या स्नेहल (बदलेले नाव) ही सुमारे दीड वर्षांपूर्वी ब्राह्मणवाडा येथील राहत्या घरून बेपत्ता झाली. त्यावेळी नातेवाईक निरंजन ठाकरे, मुलीची मैत्रिण संजीवनी (बदलेले नाव) व अन्य काही मैत्रिणींनी आमच्या मुलीला पळवून लावल्याचा आरोप शेवतकर यांनी शिरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला. त्या अनुषंगाने पोलिसांनी स्नेहलच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरून शोध चालविला. त्यावेळी ती औरंगाबाद येथे खासगी नोकरी करीत असल्याचे माहिती पडले. पोलिसांनी तिला परत आणून विचारपूस केली असता, आईवडिलांनी तिला महानुभावपंथाची दीक्षा देण्यासंबंधी जबरदस्ती केल्याने ती मानसिक तणावात आली आणि आई-वडिलांसोबत पटत नसल्यामुळे व ते त्रास देत असल्यामुळे घरातून स्वमर्जीने एकटेच निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. स्नेहलाल शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हायचे होते. परंतु, तिचे आई-वडील याला विरोध करीत होते. आतासुध्दा आई -वडिलांकडे न जाता औरंगाबादला रहायचे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले असून, तिने पोलिसांना अ‍ॅफिडेव्हीटसुद्धा करून दिले. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार, मोर्शी विभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, अधिकारी वैभव पराते, पोलीस हेड कॉन्स्टेबल तिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विवेक हेडावू यांनी कारवाई केली.दत्तक कन्येला पळवून नेल्याची तक्रार महानुभावपंथ आश्रमातील शेवतकर यांनी केली होती. मुलीचा शोध घेऊन विचारपूस केली असता, आई-वडिलांनी धार्मिक दीक्षेसाठी बळजबरी केल्याने निघून गेल्याचे ती सांगत आहे.- सुरेंंद्र अहेरकर, पोलीस निरीक्षक, शिरखेड ठाणे