गुरवार, २२ मार्च रोजी दिवस-रात्र एकसमान राहणार असून, या दिवशी दिवस व रात्र १२ तासाचे म्हणजे समान राहणार असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. ...
शीतल पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपी पसार असून, गाडगेनगर व गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा दाहीदिशा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक अभ्यास सुरू केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुनील गजभिये, रहमान खां पठाण व शीतल पाटील यांचे लोकेशन नवसारी भागात ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : आईला एसटीतून उतरून दिल्याच्या कारणावरून मुलाने एसटीच्या महिला वाहकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी माहुली जहागीर बसस्थानकावर घडली. कविता गावंडे (३०, रा. अमरावती) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. याप्रकरणात माहुली पो ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रक ...
परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतधारणी : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी १५ मार्चपासून जि.प. शाळा सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्याचे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले. त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने सकाळी ७ ते १० पर्यंत विविध शाळांना भेटी दिले असता, ब ...
बडनेरातील जुनीवस्तीत एकाच माणसाला आजवर पाच सरकारी स्वस्त धान्य दुकाने देण्यात आली आहेत. या दुकान मालकाकडून गोरगरीब जनतेच्या लुटीचे वाभाडे भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांच्या कक्षात काढले. ...
शासनाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनासाठी आदिवासींचे पुनर्वसन करून प्रतिव्यक्ती १० लाख रूपये अनुदान दिले. परंतु, मेळघाटात निरंतर बाल-मातामृत्यूचे सत्र सुरू असताना त्याकरिता कायस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाही. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रच ...