संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ग्लोबल एज्युकेशन लि.द्वारा प्रकाशित यूजीसी, नेट/सेट, मराठी पेपर भाग-दोन व जनरल अँड इंजिनीअरिंग जीआॅलॉजी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे. ...
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. ...
१०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लघु सिंचन विभागाला आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचा नाहरकत (एनओसी) दाखला घ्यावा लागणार आहे. ...
दोन दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तळ ठोकून असलेल्या नरभक्षक वाघाने रविवारी रात्री ९:३० दरम्यान पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशीचे पिलू (वगार) ठार केले. धामणगाव, तिवसा तालुक्यात ५ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर त्या वाघाने मोर्शी परिसरात प्रवेश ...
वं. तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी गुरुकुंज येथे महासमाधी परिसरातील महामार्गावर लाखो गुरुदेव भक्तांची चिकार गर्दी जमली होती. दरम्यान अम्ब्युलन्स आल्यानेर् पुन्हा मानवतेचा परिचय देत एकीकडे मार्ग मोकळा केला गेला. ...
शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे रात्री १२ वाजेपर्यंत शिरखेड पोलीस रिद्धपूर येथे गस्तीवर होते. मात्र, तरीही बाजारातील आठ दुकाने व एक घर फोडून चोरांनी अंदाजे ५० हजार रूपये लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली. ...
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. ...