जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. ...
पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, मान्सूनचे ६५ दिवस उलटत असताना पश्चिम विदर्भातील तब्बल ३८ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभार ...
मोल मजुरी करणाऱ्या पती - पत्नीने गरिबीला कंटाळून राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वºहा येथे मंगळवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली. ...
राजापेठ उड्डाणपुलाखालील रस्ता चिखलमुळे निसरडा झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या पन्नासेक दुचाकी सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत घसरून चालक जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने तातडीने तोडगा काढण्याची म ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक पथकाने मंगळवारी ३ लाख ६३ हजार २७२ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील कोकर्डा-उमरी फाट्याजवळ वडाळगव्हाण येथे ही कारवाई करण्यात आली. ...
कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे. ...
गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित ...