शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

तूर खरेदीचे चुकारे तत्काळ देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:24 IST

शेतकऱ्यांकडून शासनाने अद्यापही खरेदी न केलेल्या तूर, हरभऱ्याबद्दल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापूर्वी खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे गुरुवारपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : हरभरा खरेदीसाठी केंद्राकडून १३ जूनपर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांकडून शासनाने अद्यापही खरेदी न केलेल्या तूर, हरभऱ्याबद्दल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापूर्वी खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे गुरुवारपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.आ.बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेऊन तूर खरेदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली होती. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती चर्चेदरम्यान देण्यात आली. त्यानंतर मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. राज्यात नाफेडच्या माध्यमातून विक्रमी तूर खरेदी करण्यात आली आहे. तुरीचे चुकारे शेतकºयांना त्वरित देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नाफेडच्या मागणीनुसार कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.टोकनधारकांना प्रतिक्विंटल हजार रुपयेआॅनलॉइन पोर्टलवर नोंदणी झालेल्या, मात्र नाफेडच्यावतीने खरेदी न झालेल्या तूर व हरभऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हरभरा खरेदीला आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून १३ जूनपर्यंत मुुदतवाढ देण्यात आली असल्याचे ना. पोटे यांनी सांगितलेतीन वर्षांत शासनाची विक्रमी खरेदीनाफेडद्वारा डाळवर्गीय धान्याची आणि तेलबियांच्या आकडेवारीनुसार सन २००१ ते २०१४ या कालावधीत १ लाख ६२ हजार ७५३ मेट्रिक टन डाळींची खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ४२६.५० कोटी रुपये आहे. सन २०१५ ते २०१८ या कालावधीत १३.१५ लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ७,२९३ कोटी रुपये असल्याचे पालकमंत्री म्हणाले.