शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीचे चुकारे तत्काळ देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:24 IST

शेतकऱ्यांकडून शासनाने अद्यापही खरेदी न केलेल्या तूर, हरभऱ्याबद्दल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापूर्वी खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे गुरुवारपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : हरभरा खरेदीसाठी केंद्राकडून १३ जूनपर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांकडून शासनाने अद्यापही खरेदी न केलेल्या तूर, हरभऱ्याबद्दल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापूर्वी खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे गुरुवारपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.आ.बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेऊन तूर खरेदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली होती. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती चर्चेदरम्यान देण्यात आली. त्यानंतर मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. राज्यात नाफेडच्या माध्यमातून विक्रमी तूर खरेदी करण्यात आली आहे. तुरीचे चुकारे शेतकºयांना त्वरित देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नाफेडच्या मागणीनुसार कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.टोकनधारकांना प्रतिक्विंटल हजार रुपयेआॅनलॉइन पोर्टलवर नोंदणी झालेल्या, मात्र नाफेडच्यावतीने खरेदी न झालेल्या तूर व हरभऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हरभरा खरेदीला आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून १३ जूनपर्यंत मुुदतवाढ देण्यात आली असल्याचे ना. पोटे यांनी सांगितलेतीन वर्षांत शासनाची विक्रमी खरेदीनाफेडद्वारा डाळवर्गीय धान्याची आणि तेलबियांच्या आकडेवारीनुसार सन २००१ ते २०१४ या कालावधीत १ लाख ६२ हजार ७५३ मेट्रिक टन डाळींची खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ४२६.५० कोटी रुपये आहे. सन २०१५ ते २०१८ या कालावधीत १३.१५ लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ७,२९३ कोटी रुपये असल्याचे पालकमंत्री म्हणाले.