शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका; फळबागांना अतिवृष्टीमुळे लागली गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:18 IST

Amravati : पावसाने गळती : वघाळ, काटी, राजुरा भागांतील बागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार/वरूड : संत्रा फळबागांसह मोसंबी फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागली असून, यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे.

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रा फळबागांबरोबर मोसंबी फळबागा येथे अंदाजे आठ ते दहा हजार हेक्टरवर उभ्या आहेत. गेली २० दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला. संत्रा व मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान निदर्शनास येत आहे.

वघाळ, काटी, राजुरा बाजार, आलोडा, नांदगाव, हातुर्णा, गाडेगाव, वंडली, भापकी, बेलोरा, लोणी, अमडापूर या गावांच्या शिवारातील संत्रा व मोसंबी फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. बागेत गळालेल्या फळांचा सडा पाहायला मिळत आहे. कृषी शास्त्रज्ञांनी तातडीने या बुरशीजन्य रोगास आटोक्यात आणून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविण्याची मागणी होत आहे. फळांची गळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की, झाडावर फळ राहतील की नाही, याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. संत्रा व मोसंबी फळबागांची या अतिवृष्टीमुळे अतोनात हानी झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

लोकप्रतिनिधींनी या नुकसान झालेल्या बागांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनदरबारी आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आंबिया बहारची फळगळ ही संततधार पावसामुळे असल्याचे तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर यांनी सांगितले.

"मोसंबी झाडावर एवढ्या प्रमाणात अजून गळ पाहिली नाही. झाडावर फळे राहतील की नाही, याची आज शाश्वतीच राहिली नाही. शास्त्रज्ञांनी बांधावर येऊन मार्गदर्शन करावे."- अरुण कुसरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, गाडेगाव

"पावसाचे सातत्य राहिल्याने येथील संत्रा व मोसंबी फळबागांना जबर फटका बसला आहे. फळे मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त होत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. तातडीने सर्वेक्षण व भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे."- सुशांत पाचघरे, संत्रा उत्पादक शेतकरी, लोणी

"सततच्या पावसामुळे संत्रा झाडांची फळ गळती होत असल्याचे चित्र आहे. सततच्या पावसाने संत्रा- मोसंबीवर बुरशीजन्य फायटोप्थेराची लागण होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी २०० लिटर पाण्यात एक किलो ट्रायकोडर्मा, एक किलो पीएसबी, एक लिटर अॅझेटोबॅक्टर, एक लिटर सुडोमोनस, दोन किलो गूळ, दोन किलो बेसन एकत्र करून झाडाच्या बुंध्याशी तातडीने आळवणी (ट्रेंचिंग) करावी. साचलेले पाणी चर खोदून बाहेर काढावे. गळलेली फळे शेताबाहेर फेकावी."-डॉ. के. पी. सिंह, शास्त्रज्ञ तथा कृषी विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती