शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतकरी धोरणाविषयी विरोधी पक्ष असंवेदनशील, संजय धोत्रे यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 20:00 IST

या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतकरी कायदेशीर बंधनातून मुक्त होतील. यापुढे केवळ मंडईतील ठरावीक व्यापाºयांनाच शेतमाल विकण्यास शेतकरी बांधील नाही.

अमरावती - शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने ऐतिहासिक विधेयक पारित केले. मात्र, शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष किंचितही संवेदनशील नसल्याची टीका केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केली. या कायद्यामुळे शेतक-यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची मुभा आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल व याद्वारे शेतकरी सक्षम होतील. किमान आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी त्याच ठिकाणी राहील. या कायद्याद्वारे शेतक-यांना त्यांची पिके साठवण आणि विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहणार असल्याचे ना. धोत्रे म्हणाले.

या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतकरी कायदेशीर बंधनातून मुक्त होतील. यापुढे केवळ मंडईतील ठरावीक व्यापाºयांनाच शेतमाल विकण्यास शेतकरी बांधील नाही. याशिवाय सरकारी करापासूनही मुक्त होणार आहे. शेतकºयांना इतरही ठिकाणी शेतमाल विकण्याचे पर्याय देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यात आले आहे. आता शेतकºयांना शेतमाल राज्याच्या हद्दीत विकणे बंधनकारक असणार नाही. आता फायदेशीर किमतीवर विक्रीस उपलब्ध असलेल्या निवडीचा फायदा घेण्यास शेतकरी सक्षम असतील. देशात स्पर्धात्मक आणि डिजिटल व्यापार होईल, असे ना. धोत्रे म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची वचनपूर्ती केलेली आहे. शेतकरी किसान सन्मान योजना, एमएसपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, जनधन योजनेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांद्वारे शेतकºयांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ना. धोत्रे म्हणाले. पत्रपरिषदेला महापौर चेतन गावंडे, आमदार प्रताप अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे), माजी मंत्री अनिल बोंडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, जयंत डेहणकर, संध्या टिकले आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSanjay Dhoteसंजय धोटेPoliticsराजकारण