शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दहापैकी सात अमरावतीकरांनाच बायकोचा मोबाईल क्रमांक पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा ...

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा माणूस जिथे कुठे असेल, तेथे शेतात, जंगलात, कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र रस्त्यावर त्याच्याशी सहजतेने संपर्क साधता यावा, या जिज्ञासेतून माणसाने भ्रमणध्वनीचा शोध लावला आणि मोबाईल क्रांती घडून आली. मात्र, त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण कमी झाला आहे. टचपॅडवर बोट लावताच सर्व काही येत असल्याने बायकोचा मोबाईल क्रमांकही दहापैकी सात अमरावतीकरांना पाठ नसल्याचे दिसून आले.

मोबाईल आज सर्वांचीच गरज झाली आहे. प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. मात्र, मोबाईलमुळे स्मरणशक्तीचा वापर कमी झाला असून, माणूस परावलंबी झाला आहे. कुणाचाही नंबर वारंवार डायल करण्याऐवजी मोबाईलमध्ये तो सेव्ह करण्याची व्यवस्था आहे. केवळ तो सर्च करावा लागत असल्याने आठवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे पाहायला मिळत आहे. ‘लोकमत’ने राजकमल चौक, राजापेठसह प्रमुख चौकांमध्ये प्रत्येकी दहा जणांच्या घोळक्यात पत्नीचा मोबाईल क्रमांक किती जणांना पाठ आहे, याबाबत विचारणा केली. सात जणांनाच मोबाईल नंबर पाठ असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. विसराळूंना त्यांच्या प्रिय पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे पहिले सहा क्रमांकदेखील आठवत नव्हते.

बाॅक्स

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

महापालिका शाळेतील एका शिक्षकाला बायकोचा नंबर लक्षात नव्हता. मात्र, पूर्वी स्वत: वापरत असलेले सिम कार्ड मुलाला दिल्याने तो क्रमांक बरोबर आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या नंबरवर दरमहा रिचार्ज करावा लागत असल्याने तो क्रमांकही आपसूकच पाठ झाला आहे.

-----------

यामुळे क्रमांक पाठ

काही जणांना पत्नीसह मुलगा आणि मुलीचा नंबर मुखपाठ होता. मात्र, त्यातही गोम होती. विसरभोळा स्वभाव असल्याने अनेकदा मोबाईल घरीच राहून जातो. अशावेळी संपर्क साधण्यात अडचण येऊ नये म्हणून कुटुंबातील पत्नी, मुलाचा नंबर पाठ केल्याचे एका महसूल कर्मचाऱ्याने सांगितले.

बाॅक्स

‘पाठ करण्याची गरजच काय?’

‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत १० जणांना मोबाईल नंबर पाठ आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यातील सात जणांनी नंबर मुखपाठ असल्याची कबुली दिली. एक-दोघांनी तो डायल करून पडताळून पाहा, येथपर्यंत आत्मविश्वास दाखविला. उर्वरित व्यक्तींनी पत्नीचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह असल्याने पाठ असण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

------------------

पोरांना आठवतो, मोठ्यांना का नाही?

लहान मुले आई-वडील यांनाच अधिक कॉल करतात. एखाद्या वेळेला आपल्या मित्र अथवा मैत्रिणीला कॉल करण्याचा प्रसंग ओढवतो. त्यामुळे लहान मुलांना आई-बाबांचे नंबर पाठ असतात. मोठ्या लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने त्यांना मोबाईल क्रमांक लक्षात राहत नाहीत.

- आशिष साबू, मानसोपचार तज्ञ्ज

------------

कोट

बायकांनाही नवऱ्याचा नंबर नाही पाठ

मोबाईलमध्ये पतीदेवाचा नंबर सेव्ह केला आहे. त्यामुळे पाठ करण्याची गरजच पडली नाही. टोपणनावाने सेव्ह केला असल्याने सर्च करताच नंबर येतो. मात्र, नंबर मुखोद्गत नाही.

- गृहिणी,

पूर्वी मोबाईल नंबर पाठ होता. मात्र, आता नंबर सेव्ह असल्याने, शिवाय पतीदेवासोबत दररोजच बोलणे असल्याने रिसेंट कॉल लिस्टमध्ये तो दिसतो. त्यामुळे नंबर पाठ करण्याची गरज पडली नाही. केवळ अखेरचे दोन आकडे पाठ आहेत.

- गृहिणी, अमरावती.

कोट

मुलांना आई-बाबांचा नंबर पाठ

लहान असतानाच मोबाइल नंबर पाठ करण्याची सवय पडली. त्यामुळे बाबांचाच नव्हे तर, कुटुंबातील सर्वांचाच नंबर मुखपाठ आहे. दूरध्वनीवरून नेहमीच नंबर डायल करावा लागत असल्याने केव्हाही विचारला तर सहज सांगता येतो.

- मुलगा.