शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच

By गणेश वासनिक | Updated: June 22, 2023 17:42 IST

४५ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त

अमरावती : राज्य शासनाच्या निर्देशानुसार शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ होती. मात्र, महिनाभरातनंतरही वनविभागानेबदलीस पात्र ४० उपवनसंरक्षकांच्या (आयएफएस) बदल्या केल्या नाहीत. आता बदली प्रक्रियेला केवळ सात दिवस शिल्लक असल्याने उपवनसंरक्षकांना बदलीची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. मात्र, यंदा राज्य सरकारने विशेष बाब म्हणून जूनपर्यंत शासकीयअधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ दिली. परिणामी प्रशासनाला बदली प्रक्रिया राबविताना थोडा दिलासा मिळाला. मात्र, वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एककल्ली कारभारामुळे बदलीचा गोंधळ निस्तारत नसल्याचे चित्र आहे. खरे तर उपवनसंरक्षकांच्या बदल्यांना मुख्यमंत्री संमती देतात, त्यानंतर फाईल पुढे सरकते. मात्र, उपवनसंरक्षकांच्या बदल्यांबाबत काहीच घडामोडी दिसून येत नाही. ठाणे येथील जागेवरून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईल थांबविल्याची विश्वसनीय माहिती आहे. उपवनसंरक्षकांच्या थांबलेल्या बदल्यांबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

७५ सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या

वन विभागात पदोन्नती समितीची बैठक झाली नसल्याने ७५ सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. तर दुसरीकडे एसीएफ यांना पदोन्नती मिळत नसल्याने ४५ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. प्रभारी कारभार सुरु आहे. एसीएफच्या पदोन्नती अभावी ३५ आरएफओंकडे एसीएफचा प्रभार सोपविला आहे. सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, प्रशिक्षण व भरारी पथकात सहाय्यक वनसंरक्षकांची पदे नाहीत.

--

टॅग्स :Transferबदलीforest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारEmployeeकर्मचारी