शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:03 IST

‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे.

ठळक मुद्देलस, औषधीही नाही : वेगाने होते आजाराचे संक्रमण

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे. ज्याप्रकारे अडुळा बाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आले. त्याचप्रमाणे यासंसर्गाची लागण झालेल्या मानवालाही वेदनारहित मृत्यू देण्याशिवाय पर्याय नाही. ‘ग्लँडर्स’बाधित माणसांनाही मरणच द्यावे लागेल. मात्र, तसा प्रकार अद्याप भारतात झाला नसल्याचा दावा पशूवैद्यकतज्ज्ञ आणि पशूसंवर्धन विभागाने केला आहे. मानवांमध्ये हा आजार दुर्लभ असला तरी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी संक्रमिताला ठार मारण्याशिवाय पर्याय नाही, यावर मात्र तज्ज्ञांचे एकमत आहे. ‘ग्लँडर्स’चा संसर्ग इतक्या झपाट्याने पसरतो की बाधित मनुष्यप्राण्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वेदनारहित मृत्यू देऊनच या रोगाला अटकाव घालता येऊ शकतो. असा कायदा सन १८९९ पासून भारतात अस्तिवात आहे. ‘ग्लँडर्स’ याप्राणघातक संसर्गाची लागण झालेल्या अडुळा बाजार येथिल एका घोड्याला ठार मारण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व अश्ववर्गिय जनावरांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत.‘ग्लँडर्स’या जीवाणूजन्य आजाराचा फैलाव अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे तज्ञांच्या मते बाधितांवर उपचारापेक्षा त्याचा फैलाव रोखण्यास प्राधान्य दिले जाते. ‘ग्लँडर्स’वर परिणामकारक लस वा औषधी उपलब्ध नाही. बाधित प्राण्याच्या संपर्कात येणाºयास हा आजार संभवतो.- सुधीर गावंडे,पशूशल्यचिकित्सक‘ग्लँडर्स’मानवासाठी घातक असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अश्ववर्गिय जनावरांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. अडुळा बाजारच्या‘ग्लँडर्स’ बाधित घोड्याला ३० जुलैला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने शासनही परवानगी देते.- डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त ,जिल्हा पशुसंवर्धन विभाग‘ग्लँडर्स’बाधित मनुष्यात आढळणारी लक्षणेरक्तप्रवाहात संक्रमण, जुनाट पुरळातून संक्रमण, ताप, स्रायू वेदना, छाती दुखणे, स्रायू तणाव, डोकेदुखी, अतीजोरदार प्रकाश संवेदनशिलता, अतिसार, त्वचा संक्रमण, फुफ्फुसाचा संसर्ग, रक्त संक्रमण, त्वचेची विकृती, यकृताला फोडे, त्वचा व्रण, त्वचा जळू लागणे, अंगावर गाठी येणे.नवरदेवांनो सावधान !अडुळाबाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आल्यानंतर त्याचा मानवालाही धोका होऊ शकतो,यासाठी अश्ववर्गिय जनावरांची रक्तजलनमुने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी घोडे,गाढव आणि खेचरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात लग्नाच्या वेळी नवरदेवाची घोड्यावरुन वरात काढली जाते.याशिवाय अंजनगावसह अन्य काही गावांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी वापरली जाते. त्यामुळे लग्नप्रसंगी नवरदेव आणि घोडागाडीतून प्रवास करणाºयांना ‘ग्लँडर्स’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.