शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:03 IST

‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे.

ठळक मुद्देलस, औषधीही नाही : वेगाने होते आजाराचे संक्रमण

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे. ज्याप्रकारे अडुळा बाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आले. त्याचप्रमाणे यासंसर्गाची लागण झालेल्या मानवालाही वेदनारहित मृत्यू देण्याशिवाय पर्याय नाही. ‘ग्लँडर्स’बाधित माणसांनाही मरणच द्यावे लागेल. मात्र, तसा प्रकार अद्याप भारतात झाला नसल्याचा दावा पशूवैद्यकतज्ज्ञ आणि पशूसंवर्धन विभागाने केला आहे. मानवांमध्ये हा आजार दुर्लभ असला तरी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी संक्रमिताला ठार मारण्याशिवाय पर्याय नाही, यावर मात्र तज्ज्ञांचे एकमत आहे. ‘ग्लँडर्स’चा संसर्ग इतक्या झपाट्याने पसरतो की बाधित मनुष्यप्राण्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वेदनारहित मृत्यू देऊनच या रोगाला अटकाव घालता येऊ शकतो. असा कायदा सन १८९९ पासून भारतात अस्तिवात आहे. ‘ग्लँडर्स’ याप्राणघातक संसर्गाची लागण झालेल्या अडुळा बाजार येथिल एका घोड्याला ठार मारण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व अश्ववर्गिय जनावरांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत.‘ग्लँडर्स’या जीवाणूजन्य आजाराचा फैलाव अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे तज्ञांच्या मते बाधितांवर उपचारापेक्षा त्याचा फैलाव रोखण्यास प्राधान्य दिले जाते. ‘ग्लँडर्स’वर परिणामकारक लस वा औषधी उपलब्ध नाही. बाधित प्राण्याच्या संपर्कात येणाºयास हा आजार संभवतो.- सुधीर गावंडे,पशूशल्यचिकित्सक‘ग्लँडर्स’मानवासाठी घातक असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अश्ववर्गिय जनावरांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. अडुळा बाजारच्या‘ग्लँडर्स’ बाधित घोड्याला ३० जुलैला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने शासनही परवानगी देते.- डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त ,जिल्हा पशुसंवर्धन विभाग‘ग्लँडर्स’बाधित मनुष्यात आढळणारी लक्षणेरक्तप्रवाहात संक्रमण, जुनाट पुरळातून संक्रमण, ताप, स्रायू वेदना, छाती दुखणे, स्रायू तणाव, डोकेदुखी, अतीजोरदार प्रकाश संवेदनशिलता, अतिसार, त्वचा संक्रमण, फुफ्फुसाचा संसर्ग, रक्त संक्रमण, त्वचेची विकृती, यकृताला फोडे, त्वचा व्रण, त्वचा जळू लागणे, अंगावर गाठी येणे.नवरदेवांनो सावधान !अडुळाबाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आल्यानंतर त्याचा मानवालाही धोका होऊ शकतो,यासाठी अश्ववर्गिय जनावरांची रक्तजलनमुने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी घोडे,गाढव आणि खेचरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात लग्नाच्या वेळी नवरदेवाची घोड्यावरुन वरात काढली जाते.याशिवाय अंजनगावसह अन्य काही गावांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी वापरली जाते. त्यामुळे लग्नप्रसंगी नवरदेव आणि घोडागाडीतून प्रवास करणाºयांना ‘ग्लँडर्स’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.