शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धामणगाव तालुक्यातील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त आश्वासनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

नाही राहायला घर नोकरी मिळणार कुठे तीस वर्षात समस्यांचा डोंगर उभाच लोकमत रियालिटी चेक फोटो - राऊत २४ ...

नाही राहायला घर नोकरी मिळणार कुठे

तीस वर्षात समस्यांचा डोंगर उभाच

लोकमत रियालिटी चेक

फोटो - राऊत २४ ओ

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपली शेती गेली तरी चालेल, मात्र कुटुंबातील एकाला नोकरी मिळेल, घरासाठी जागा उपलब्ध होईल, आपल्या परिसरात सिंचनाची अधिक व्यवस्था होईल, अशी मनात इच्छा बाळगून तब्बल सहा गावांतील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांनी कोणताही विचार न करता आपली शेतजमीन दिली. मात्र, ३० वर्षांमध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाला ना नोकरी मिळाली, ना पूर्ण अनुदानाची रक्कम. आजही येथील कुटुंब घरकुलापासून वंचित आहे. समस्यांचा डोंगर कायम आहे. ते प्रकल्पग्रस्त नशिबाची दोष देत आहेत.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील २१ व धामणगाव तालुक्यातील चिंचपूर, येरली, शिंदोडी, तुळजापूर, बऱ्हाणपूर, वरूड बगाजी या सहा गावांचे पुनर्वसन करून लोअर वर्धा विभागाने तब्बल ३१ दरवाजांचे बगाजी सागर धरण उभारले. या धरणाचा उपयोग वर्धा, देवळी, पुलगाव, हिंगणघाट येथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. मात्र, ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपली शेत जमीन व घरे दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या प्राथमिक सुविधा अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याने ते आश्वासनावरच जगत आहेत.

ना राहायला घर, ना रस्ते

शिदोडी गावात दहा वर्षांपूर्वी नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम झाले. नाल्याच्या उतार न काढल्यामुळे सार्वजनिक विहिरीत हे सांडपाण्यासह नालीचे पाणी येते. दररोज या गावाला दूषित पाणी द्यावे लागते. गतवर्षी तब्बल ४५ लोकांना अतिसाराची लागण या गावात झाली होती. येथील लोकांना आजही घरे नाहीत. चिंचपूर येथे ग्रामपंचायत कार्यालय नाही. जलशुद्धीकरण नसल्याने दूषित पाणी प्यावे लागते. शेतात जाण्यासाठी रस्ते नाही. मेंडकी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले नाही. मंजूर झालेल्या भूखंडाचे वाटप अद्यापही नाही. स्मशानभूमीची सुविधा नाही. अशा तब्बल १६ समस्यांसाठी येथील ग्रामस्थ शासनाशी दोन हात करीत आहेत. गटग्रामपंचायत व प्रकल्पग्रस्त असलेली वरूड बगाजी, येरली या दोन्ही गावांमध्ये अनेकांना जागा उपलब्ध नाही. त्यामुळे टिनाच्या शेडमध्ये आजही राहावे लागत आहे. सांडपाण्याच्या नाल्या नाहीत. गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे कळायला मार्ग नाही. स्मशानभूमीत जायला रस्ता नाही. पुनर्वसनमधील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने ३१ वर्षांमध्ये समस्या कायम आहे. चिंचपूरचे सरपंच चंद्रशेखर कडू, शिदोडीच्या सरपंचा करिष्मा शिवरकर, उपसरपंच रीतेश निस्ताने, वरूड बगाजीच्या सरपंच स्नेहा लुटे, उपसरपंच गणेश धोटे यांनी ही कैफियत मांडली आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येत चारशे युवक बेरोजगार

तालुक्यातील सहा प्रकल्पग्रस्त गावांतील केवळ दहा लोकांना ३१ वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळाली, तर उच्चशिक्षितांची संख्या चारशेच्या जवळपास आहे. डीएड, बीएड, बीए, एमएस्सी, बीएस्सी, कृषी पदवीधर असे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दरवेळी लागतात. मात्र, या प्रमाणपत्राला शासनच केराची टोपली दाखवत असल्याची वस्तुस्थिती येथील बेरोजगारांनी मांडली आहे.

तुटपुंजा निधी, कसा होणार विकास?

शासनाकडून दरवेळी पुरेसा निधी मिळत नाही. चिंचपूर येथे वीस वर्षांपासून रस्ते, नाली बांधकाम झाले नाही. शिदोडी, वरूड बगाजी, येरली, तुळजापूर, बऱ्हाणपूर या गावांमध्ये समस्या कायम असताना, केवळ प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी देण्यात आला. प्रत्यक्षात या गावाला सात ते आठ कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी अपेक्षित आहेत. दरवेळी येणाऱ्या निधीतून निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. त्यामुळे संबंधित गावांमधील प्रकल्पग्रस्तांच्या गावातील समस्या कायम राहतात. आतापर्यंत झालेल्या विकासकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.