शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धामणगाव तालुक्यातील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त आश्वासनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

नाही राहायला घर नोकरी मिळणार कुठे तीस वर्षात समस्यांचा डोंगर उभाच लोकमत रियालिटी चेक फोटो - राऊत २४ ...

नाही राहायला घर नोकरी मिळणार कुठे

तीस वर्षात समस्यांचा डोंगर उभाच

लोकमत रियालिटी चेक

फोटो - राऊत २४ ओ

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपली शेती गेली तरी चालेल, मात्र कुटुंबातील एकाला नोकरी मिळेल, घरासाठी जागा उपलब्ध होईल, आपल्या परिसरात सिंचनाची अधिक व्यवस्था होईल, अशी मनात इच्छा बाळगून तब्बल सहा गावांतील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांनी कोणताही विचार न करता आपली शेतजमीन दिली. मात्र, ३० वर्षांमध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाला ना नोकरी मिळाली, ना पूर्ण अनुदानाची रक्कम. आजही येथील कुटुंब घरकुलापासून वंचित आहे. समस्यांचा डोंगर कायम आहे. ते प्रकल्पग्रस्त नशिबाची दोष देत आहेत.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील २१ व धामणगाव तालुक्यातील चिंचपूर, येरली, शिंदोडी, तुळजापूर, बऱ्हाणपूर, वरूड बगाजी या सहा गावांचे पुनर्वसन करून लोअर वर्धा विभागाने तब्बल ३१ दरवाजांचे बगाजी सागर धरण उभारले. या धरणाचा उपयोग वर्धा, देवळी, पुलगाव, हिंगणघाट येथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. मात्र, ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपली शेत जमीन व घरे दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या प्राथमिक सुविधा अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याने ते आश्वासनावरच जगत आहेत.

ना राहायला घर, ना रस्ते

शिदोडी गावात दहा वर्षांपूर्वी नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम झाले. नाल्याच्या उतार न काढल्यामुळे सार्वजनिक विहिरीत हे सांडपाण्यासह नालीचे पाणी येते. दररोज या गावाला दूषित पाणी द्यावे लागते. गतवर्षी तब्बल ४५ लोकांना अतिसाराची लागण या गावात झाली होती. येथील लोकांना आजही घरे नाहीत. चिंचपूर येथे ग्रामपंचायत कार्यालय नाही. जलशुद्धीकरण नसल्याने दूषित पाणी प्यावे लागते. शेतात जाण्यासाठी रस्ते नाही. मेंडकी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले नाही. मंजूर झालेल्या भूखंडाचे वाटप अद्यापही नाही. स्मशानभूमीची सुविधा नाही. अशा तब्बल १६ समस्यांसाठी येथील ग्रामस्थ शासनाशी दोन हात करीत आहेत. गटग्रामपंचायत व प्रकल्पग्रस्त असलेली वरूड बगाजी, येरली या दोन्ही गावांमध्ये अनेकांना जागा उपलब्ध नाही. त्यामुळे टिनाच्या शेडमध्ये आजही राहावे लागत आहे. सांडपाण्याच्या नाल्या नाहीत. गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे कळायला मार्ग नाही. स्मशानभूमीत जायला रस्ता नाही. पुनर्वसनमधील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने ३१ वर्षांमध्ये समस्या कायम आहे. चिंचपूरचे सरपंच चंद्रशेखर कडू, शिदोडीच्या सरपंचा करिष्मा शिवरकर, उपसरपंच रीतेश निस्ताने, वरूड बगाजीच्या सरपंच स्नेहा लुटे, उपसरपंच गणेश धोटे यांनी ही कैफियत मांडली आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येत चारशे युवक बेरोजगार

तालुक्यातील सहा प्रकल्पग्रस्त गावांतील केवळ दहा लोकांना ३१ वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळाली, तर उच्चशिक्षितांची संख्या चारशेच्या जवळपास आहे. डीएड, बीएड, बीए, एमएस्सी, बीएस्सी, कृषी पदवीधर असे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दरवेळी लागतात. मात्र, या प्रमाणपत्राला शासनच केराची टोपली दाखवत असल्याची वस्तुस्थिती येथील बेरोजगारांनी मांडली आहे.

तुटपुंजा निधी, कसा होणार विकास?

शासनाकडून दरवेळी पुरेसा निधी मिळत नाही. चिंचपूर येथे वीस वर्षांपासून रस्ते, नाली बांधकाम झाले नाही. शिदोडी, वरूड बगाजी, येरली, तुळजापूर, बऱ्हाणपूर या गावांमध्ये समस्या कायम असताना, केवळ प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी देण्यात आला. प्रत्यक्षात या गावाला सात ते आठ कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी अपेक्षित आहेत. दरवेळी येणाऱ्या निधीतून निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. त्यामुळे संबंधित गावांमधील प्रकल्पग्रस्तांच्या गावातील समस्या कायम राहतात. आतापर्यंत झालेल्या विकासकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.