शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

एक गाव अन् दोन सरपंच! जुन्या सरपंचांचा कार्यकाळ बाकी असल्याने  २६३ ग्रामपंचायतींमध्ये पेचप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 7:07 PM

अमरावती जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत.

अमरावती - जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत. मात्र जुन्या सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला नसल्याने सध्या या ग्रामपंचायतींमध्ये दोन सरपंच अस्तित्वात आहेत. जुन्या सरपंचांना धोरणात्मक अधिकार नाही, नव्यांना कार्यभार नाही, यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २६३  ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आटोपली. यावेळी प्रथमच जनतेतून थेट सरपंचांची निवडणूक झाल्यामुळे निवडून आलेल्या सरपंचांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी जुन्या सरपंचांचा कालावधी संपुष्टात आलेला नसल्यामुळे तेदेखील प्रभारी सरपंच आहेत. साधारणपणे २६ डिसेंबरपर्यंत या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक होणार असल्याने तोपर्यंत जुनेच सरपंच कायम राहणार असले तरी ते नामधारी आहेत. यापूर्वी सरपंचांची निवड पहिल्या सर्वसाधारण सभेत व्हायची, आता मात्र ज्या दिवसी निकाल लागला त्याच दिवशी नवे सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांना पूर्वीचे सरपंचांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच प्रभार मिळणार आहे. मात्र यापुढील सरपंचपदासाठी ही प्रक्रिया बदललेली राहील. नव्या सरपंचाच्या कार्यकाळानुसार ही निवडणूक होईल.यावेळी मतमोजणीनंतर सदस्यांसह सरपंचदेखील निवडून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रदेखील आयोगाच्याकडून प्राप्त झाले आहेत. म्हणजेच त्यांना आयोगाने सरपंचपदाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे गावाचा खरा कारभारी कोण, असा संभ्रम निर्माण झाला आहे.  उपसरपंच निवडीच्या बैठकीत सरपंच सभेचे अध्यक्षग्रामपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सरपंच्यांना कार्यभार सोपविण्यात येणार आहे. याच दिवसी उपसरपंचाची निवडणूक होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जरी पदसिद्ध सरपंच असले तरी निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक विभागाच्यांतर्गत महसूल विभागाचा अधिकाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निवडणुकीत जर उपसरपंचपदाला समसमान मते मिळाली, तर निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र सरपंचालाच राहणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार