शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहरात घरे एक लाख, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केवळ दोन हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने महापालिकेच्यावतीने जलपुनर्भरणची संकल्पना राबविण्यात आली.

ठळक मुद्देअनास्था : बांधकाम परवाना देताना बंधन, अंमलबजावणी केव्हा?

सुनील चौरसिया।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीत सद्यस्थितीत एक लाख पक्की घरे आणि ४० हजार झोपड्या आहेत. मात्र, जलसंवर्धनाच्या दृष्टीने केवळ दोन हजार कुटुंबांनीच पाऊल उचलल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने महापालिकेच्यावतीने जलपुनर्भरणची संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील शाळा, सार्वजनिक रुग्णालये, उद्यान, खुले मैदान, महापापालिका कार्यालय, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या घरी, तसेच नवनिर्मित मंगल कार्यालयांसह घरांसह आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याव्यतिरिक्त सामाजिक संघटनांनीदेखील रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविण्यास पुढाकार घेतला.महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १५४३ रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आल्याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. खासगी तत्त्वावर नागरिकांनीसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयत्न चालविला आहे. यात आणखी भर पडावी व पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने महापालिका अधिकाऱ्यांद्वारा सामान्य नागरिकांनीदेखील आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेण्याचे आवाहन केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणारे घरमालकाला बांधकाम परवानगीच्या वेळी शुल्कात विशेष सूट देण्याचीदेखील महापालिकेने नियमावली लागू केल्याचा विषय सभागृहात ठरला.महापालिकेत आकडेवारी नाहीअमरावती महापालिका क्षेत्रांतर्गत सन २०१९ पूर्वी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपापल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. जलसंवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी समजून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका अधिकाºयांनी केले आहे. अलीकडे भूगर्भातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाऊ देता भूगर्भात मुरविण्याच्या उद्देशाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे झाले आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्यावेत. बांधकामावेळी एनओसी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची अट घातली आहे.- चेतन गावंडे, महापौर,अमरावती

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी