शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 8, 2023 16:43 IST

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास

गजानन मोहोड

अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त तर यंदा भर पावसाळ्यात महिनाभर पावसाचा खंड यामुळे पिकांची दैना झालेली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्याने मात केली. यंदाच्या आठ महिन्यात तब्बल ७३७ शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या आठ महिन्यात दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूचा फास ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वाधिक २०६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या जिल्ह्यात दर दिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात १९४, यवतमाळ १८९, अकोला १०४ व वाशिम जिल्ह्यात ४४ शेतकरी आत्महत्या यंदाच्या आठ महिन्यात झालेल्या आहेत.

विभागात शेतकरी आत्महत्यांचे क्लस्टर शोधून तेथील तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येऊन शासन योजनांचा लाभ घेण्याचे सूतोवाच विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले होते. प्रत्यक्षात हे अभियान पुढे सरकलेच नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन हा देखील पांढरा हत्ती ठरल्याने शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येते.

सन २००१ पासून १९,६०३ शेतकरी आत्महत्या

विभागातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५१४८, बुलडाणा ४०६६, यवतमाळ ५५८७, अकोला २८९५ व वाशिम जिल्ह्यात १९०७ अशा एकूण १९,६०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८४५७ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय १०,१९९ प्रकरणे अपात्र तर २३६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

या कारणांमुळे होत आहेत शेतकरी आत्महत्या

नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान, दुष्काळ, नापिकी, बँका व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे विभागातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गरजू शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रDeathमृत्यूAmravatiअमरावती