शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 8, 2023 16:43 IST

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास

गजानन मोहोड

अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त तर यंदा भर पावसाळ्यात महिनाभर पावसाचा खंड यामुळे पिकांची दैना झालेली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्याने मात केली. यंदाच्या आठ महिन्यात तब्बल ७३७ शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या आठ महिन्यात दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूचा फास ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वाधिक २०६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या जिल्ह्यात दर दिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात १९४, यवतमाळ १८९, अकोला १०४ व वाशिम जिल्ह्यात ४४ शेतकरी आत्महत्या यंदाच्या आठ महिन्यात झालेल्या आहेत.

विभागात शेतकरी आत्महत्यांचे क्लस्टर शोधून तेथील तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येऊन शासन योजनांचा लाभ घेण्याचे सूतोवाच विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले होते. प्रत्यक्षात हे अभियान पुढे सरकलेच नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन हा देखील पांढरा हत्ती ठरल्याने शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येते.

सन २००१ पासून १९,६०३ शेतकरी आत्महत्या

विभागातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५१४८, बुलडाणा ४०६६, यवतमाळ ५५८७, अकोला २८९५ व वाशिम जिल्ह्यात १९०७ अशा एकूण १९,६०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८४५७ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय १०,१९९ प्रकरणे अपात्र तर २३६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

या कारणांमुळे होत आहेत शेतकरी आत्महत्या

नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान, दुष्काळ, नापिकी, बँका व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे विभागातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गरजू शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रDeathमृत्यूAmravatiअमरावती