शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 8, 2023 16:43 IST

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास

गजानन मोहोड

अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त तर यंदा भर पावसाळ्यात महिनाभर पावसाचा खंड यामुळे पिकांची दैना झालेली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्याने मात केली. यंदाच्या आठ महिन्यात तब्बल ७३७ शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या आठ महिन्यात दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूचा फास ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वाधिक २०६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या जिल्ह्यात दर दिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात १९४, यवतमाळ १८९, अकोला १०४ व वाशिम जिल्ह्यात ४४ शेतकरी आत्महत्या यंदाच्या आठ महिन्यात झालेल्या आहेत.

विभागात शेतकरी आत्महत्यांचे क्लस्टर शोधून तेथील तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येऊन शासन योजनांचा लाभ घेण्याचे सूतोवाच विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले होते. प्रत्यक्षात हे अभियान पुढे सरकलेच नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन हा देखील पांढरा हत्ती ठरल्याने शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येते.

सन २००१ पासून १९,६०३ शेतकरी आत्महत्या

विभागातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५१४८, बुलडाणा ४०६६, यवतमाळ ५५८७, अकोला २८९५ व वाशिम जिल्ह्यात १९०७ अशा एकूण १९,६०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८४५७ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय १०,१९९ प्रकरणे अपात्र तर २३६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

या कारणांमुळे होत आहेत शेतकरी आत्महत्या

नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान, दुष्काळ, नापिकी, बँका व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे विभागातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गरजू शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रDeathमृत्यूAmravatiअमरावती