शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

झेडपीच्या दीड हजार शाळांना चार महिन्यांपासून दमडीही नाही, कामे करायची तरी कशी?

By जितेंद्र दखने | Updated: November 2, 2023 17:36 IST

मुख्याध्यापक, शिक्षकांवर आर्थिक भूर्दंड

अमरावती :जिल्हा परिषद शाळा ३०जूनला पासुन सुरु झाल्या आहेत. परंतु गत चार महीन्यापासून जिल्हाभरातील एक रूपयाचे अनुदान शाळांना मिळाले नाही. त्यामुळे दिड हजारावर शाळा गत चार महिन्यापासून आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत.अनुदान नसल्यामुरूळे शाळेचा हा सर्व आर्थिक भूर्दंड मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर पडत आहे.

जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होवून चार महीन्याचा कालावधी लोटून गेला आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ५७० शाळांना अद्यापपर्यत शाळांना कुठल्याची प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. वर्षभर शाळेचा खर्च भागविण्यासाठी शासनाकडून ४ टक्के सादील व समग्र शिक्षा अभियान मधून अनुदान दिले जात होते. 

या अगोदर सर्व शिक्षा अभियानातून शाळा अनुदान ५ ते १० हजार,शाळा देखभाल दुरुस्तीसाठी, ७ ते १५ हजार आणि शिक्षक अनुदान १००० हजार रुपये मिळत होते. या मधुन शाळेचा खर्च भागवला जात होता. परंतु गत वर्षापासुन हा निधी समग्र शिक्षा अभियान मधून शाळाच अनुदान दिले जात आहे. ते सुद्धा शाळेच्या पटसंख्येवर आधारीत दिले जात होते. अशातच चालू शैक्षणिक सत्रातील चार महीने लोटून गेले. तरीही जिल्हातील १५७९ झेडपी शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहे.शासनाने शिक्षकाकडे अशैक्षणिक कामे सोपवू नये,शाळांना मिळणारे अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर व पदाधिकारी यांनी केली आहे.

तालुकानिहाय शाळांची संख्या

अचलपूर १२८, अमरावती ११२, अंजनगाव सुजी ८७, भातकुली ११०, चांदूर बाजार १२१, चांदूर रेल्वे ६८, चिखलदरा १६३, दर्यापूर १२९, धामनगांव रेल्वे ८३, धारणी १७०, मोर्शी १०२, नांदगाव खंडेश्र्वर १२४, तिवसा ७६, वरूड १०६ एकूण १५७९

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषदfundsनिधीAmravatiअमरावती