शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

जुन्या आठवणीत जंगलात रमले आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:12 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून अकोला जिल्ह्यात पुनर्वसित झालेल्या आदिवासींनी ‘शेतजमीन द्या, मगच आमच्याजवळ या’ अशी मागणी करीत जंगलातील मूळ गावी मागील १५ दिवसांपासून त्यांनी जंगलातच ठिय्या टाकला आहे.

ठळक मुद्देपुनर्वसित ठाम : शेतजमीन द्या, मगच आमच्याजवळ या

नरेंद्र जावरेआॅनलाईन लोकमतचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून अकोला जिल्ह्यात पुनर्वसित झालेल्या आदिवासींनी ‘शेतजमीन द्या, मगच आमच्याजवळ या’ अशी मागणी करीत जंगलातील मूळ गावी मागील १५ दिवसांपासून त्यांनी जंगलातच ठिय्या टाकला आहे. ते येथे रमले असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अख्खे प्रशासन त्यांच्या सुरक्षेच्या कामी लागले आहे.मूळ गावी गेलेले आदिवासी दिवसभर नदी-नाल्यात मासे आणि खेकडे पकडून उदरनिर्वाह करीत आहेत. सहकारी त्यांना साहित्य पुरवित आहेत. त्यांचे हे अनोखे आंदोलन प्रशासनाची झोप उडविणारे ठरले आहे. तथापि, येत्या दोन-चार दिवसांत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.प्रशासनाशी विसंवादपहिल्या टप्प्यात आदिवासींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी चर्चा केल्यावर मुंबई येथे वर्षा बंगल्यावर बैठक ठरली होती. विविध मागण्यांसह नोकरी व शेतीची मागणी करण्यात आली. मात्र, काही अवधी लागल्याने पुन्हा आदिवासी संतापले. त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आ. बच्चू कडू यांच्याशी संवाद साधीत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, प्रत्यक्ष कृती होत नसल्याचा आरोप करीत २५ डिसेंबर २०१७ रोजी व्याघ्र प्रकल्पाचे नाके भेदत आदिवासी मूळ गावी परतले. प्रशासनाचा त्यांच्याशी दररोज संवाद सुरू आहे. मात्र, ‘शेतीचा सातबारा आणा, तेव्हाच आमच्यापुढे या’ असा करडा इशारा देत थंडीत शेकोट्या आणि पालाच्या झोपड्या टाकून हजारच्या जवळपास आदिवासी आपल्या मूळ गावी परतले आहेत. संतापून परतले मूळ गावी२०११ ते २०१५ या पाच वर्षांत सोमठाणा खु., सोमठाणा बु., नागरतास, अमोना, केलपाणी, धारगड, बारूखेडा आणि गुल्लरघाट या आठ गावांचे टप्प्याटप्प्याने अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले. शासननियमाने त्यांना मोबदलासुद्धा देण्यात आला. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विविध आजारांनी २३२ पेक्षा अधिक आदिवासींचा मृत्यू झाला. रोजगाराचा अभाव तसेच शेतजमीन गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शाळा, ग्रामपंचायत या सुविधा पुनर्वसनानंतर मिळाल्या नसल्याने आदिवासी संतापले होते.