शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमधील अधिकारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे!

By admin | Updated: November 21, 2015 00:17 IST

भूविकास बँकेच्या मुंबईस्थित शिखर बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनाची भविष्याकालीन तरतूद करण्यात आल्याने ते अधिकारी-कर्मचारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे आहेत का,...

भूविकास बँक : जिल्हास्तरावर कर्मचारी २६ महिन्यांपासून वेतनाविनालोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीभूविकास बँकेच्या मुंबईस्थित शिखर बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनाची भविष्याकालीन तरतूद करण्यात आल्याने ते अधिकारी-कर्मचारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे आहेत का, असा ज्वलंत प्रश्न जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरावरील भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मागील २६ महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाहीत. अमरावतीसह राज्यातील २९ भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुमारे २ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत.उल्लेखनीय म्हणजे अमरावती जिल्हा भूविकास बँकेत लिपिक असलेल्या राजेंद्र काळबांडे यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली होती. सरकारने आता तरी बँकेच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची थकीत रक्कम द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी उदासीनता या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या २६ महिन्यांपासून अमरावती भूविकास बँकेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापक ते शिपाई तथा ४० जणांना एक पैसाही मिळालेला नाही. दुसरीकडे मुंबईस्थित भूविकास बँकेच्या शिखर बँकेत कार्यरत असलेल्या ४२ कर्मचाऱ्यांचा पुढील ६ वर्षांच्या वेतनासाठी तब्बल ३७ कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. ही सापत्न वागणूक नव्हे का, असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील शिखर भूविकास बँक, मुंबई व २९ जिल्हा भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय १२ मे २०१५ रोजी सरकारने घेतला आहे. बँकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई रक्कम, थकीत पगार व अनुषंगिक सर्व रक्कम कर्जाच्या वसुलीतून दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून येणारी कर्जवसुली फक्त २.७५ कोटी असून ४० कर्मचाऱ्यांना मात्र १४.७५ कोटी रुपये द्यावयाचे आहेत. सततची नापिकी, अस्मानी संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नाही. त्यापार्श्वभूमीवर नुकसानभरपाई आणि वेतनाची थकीत रक्कम कधी मिळेल याबाबत जिल्ह्यासह राज्यातील भूविकास बँकातील अधिकारी कर्मचारी साशंक आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरकारकडून ‘घेणे’ असलेली रक्कम कधी मिळेल, अशा विवंचनेत हे अधिकारी कर्मचारी अडकले असताना आज अचानक या कर्मचाऱ्यांना बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शनिवार त्यांच्यासाठी बँकेतील शेवटचा दिवस ठरणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी आज काळादिवसभूविकास बँकेच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबर हा काळादिवस ठरणार आहे. शुक्रवारी अवसायक गौतम वालदे यांनी अमरावती येथील ४० कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक ताब्यात घेतले असून शनिवारी या कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्यात येणार आहे. सहकार सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी हे कर्मचारी बँकेला कायमचे अलविदा करणार आहेत. या कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी पाठविण्यात येत असून नुकसान भरपाई मात्र त्यांना देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘दैवगती ही न्यारी बुध्दी, काय करेल बिचारी’ ही संजय महल्ले या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे.