शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

मुंबईमधील अधिकारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे!

By admin | Updated: November 21, 2015 00:17 IST

भूविकास बँकेच्या मुंबईस्थित शिखर बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनाची भविष्याकालीन तरतूद करण्यात आल्याने ते अधिकारी-कर्मचारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे आहेत का,...

भूविकास बँक : जिल्हास्तरावर कर्मचारी २६ महिन्यांपासून वेतनाविनालोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीभूविकास बँकेच्या मुंबईस्थित शिखर बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनाची भविष्याकालीन तरतूद करण्यात आल्याने ते अधिकारी-कर्मचारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे आहेत का, असा ज्वलंत प्रश्न जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरावरील भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मागील २६ महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाहीत. अमरावतीसह राज्यातील २९ भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुमारे २ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत.उल्लेखनीय म्हणजे अमरावती जिल्हा भूविकास बँकेत लिपिक असलेल्या राजेंद्र काळबांडे यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली होती. सरकारने आता तरी बँकेच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची थकीत रक्कम द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी उदासीनता या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या २६ महिन्यांपासून अमरावती भूविकास बँकेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापक ते शिपाई तथा ४० जणांना एक पैसाही मिळालेला नाही. दुसरीकडे मुंबईस्थित भूविकास बँकेच्या शिखर बँकेत कार्यरत असलेल्या ४२ कर्मचाऱ्यांचा पुढील ६ वर्षांच्या वेतनासाठी तब्बल ३७ कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. ही सापत्न वागणूक नव्हे का, असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील शिखर भूविकास बँक, मुंबई व २९ जिल्हा भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय १२ मे २०१५ रोजी सरकारने घेतला आहे. बँकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई रक्कम, थकीत पगार व अनुषंगिक सर्व रक्कम कर्जाच्या वसुलीतून दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून येणारी कर्जवसुली फक्त २.७५ कोटी असून ४० कर्मचाऱ्यांना मात्र १४.७५ कोटी रुपये द्यावयाचे आहेत. सततची नापिकी, अस्मानी संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नाही. त्यापार्श्वभूमीवर नुकसानभरपाई आणि वेतनाची थकीत रक्कम कधी मिळेल याबाबत जिल्ह्यासह राज्यातील भूविकास बँकातील अधिकारी कर्मचारी साशंक आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरकारकडून ‘घेणे’ असलेली रक्कम कधी मिळेल, अशा विवंचनेत हे अधिकारी कर्मचारी अडकले असताना आज अचानक या कर्मचाऱ्यांना बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शनिवार त्यांच्यासाठी बँकेतील शेवटचा दिवस ठरणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी आज काळादिवसभूविकास बँकेच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबर हा काळादिवस ठरणार आहे. शुक्रवारी अवसायक गौतम वालदे यांनी अमरावती येथील ४० कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक ताब्यात घेतले असून शनिवारी या कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्यात येणार आहे. सहकार सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी हे कर्मचारी बँकेला कायमचे अलविदा करणार आहेत. या कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी पाठविण्यात येत असून नुकसान भरपाई मात्र त्यांना देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘दैवगती ही न्यारी बुध्दी, काय करेल बिचारी’ ही संजय महल्ले या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे.