शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नागरिकांना आॅक्टोबर हिटचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:57 IST

वातावरणातील बदलामुळे १५ दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हैराण आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक असह्य उन्हाचा अनुभव घेत आहेत.

ठळक मुद्देतापमान ३४ अंशांवर : कुलर पंख्यांचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणातील बदलामुळे १५ दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हैराण आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक असह्य उन्हाचा अनुभव घेत आहेत.पहाटे हलका गारवा, दिवसभर कडाडून उन्ह आणि रात्रीच्या वेळी उकाडा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. साधारणत: ३० अंश असणारे कमाल तापमान ३४ च्या पुढे सरकले आहे. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत आहे.हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन तापतेच आॅक्टोबर महिन्यात या नक्षत्राला सुरुवात होते. मात्र यावर्षी सप्टेंबरपासूनच कडक ऊन तापू लागले आहे. वातावरणातील दमटपणा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून, नागरिक त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाची उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जिल्हावासीयांचा चिंता वाढली आहे. यावर्षी सप्टेंबरपासून तापमानात वाढ झाल्यामुळे आक्टोबरपूर्वीच हिटचे चटके नागरिक सहन करीत आहेत. दैनंदिन जीवनावर उन्हाचा परिणाम झाला असून दुपारच्या वेळी रस्ते सुनसान होत आहेत. दमट वातावरणाने नागरिक बेजार झाले असून, कुलर, पंख्यांचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ३२ ते ३५ अशांपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर उन्हाचा पारा दररोज वाढत चालला आहे.