सक्तीची नव्हे, गरज स्वयंशासनाची !
By Admin | Updated: February 6, 2016 00:12 IST2016-02-06T00:12:24+5:302016-02-06T00:12:24+5:30
शेवटी डोके तुमचे आहे. हेल्मेट तुमच्या डोक्यावरंच राहावे, हेल्मेटची रक्कम शासनदरबारी जमा होत नाही.

सक्तीची नव्हे, गरज स्वयंशासनाची !
प्रदीप भाकरे अमरावती
शेवटी डोके तुमचे आहे. हेल्मेट तुमच्या डोक्यावरंच राहावे, हेल्मेटची रक्कम शासनदरबारी जमा होत नाही. त्यामुळे हेल्मेट सक्तीची नव्हे, तर स्वयंशासनाची विषयवस्तू असल्याची सांघिक प्रतिक्रिया उमटली आहे.
औरंगाबाद, पुण्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्याने हेल्मेट सक्तीचा मुद्दा प्रकाशात आला. औरंगाबादेत फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती केली. त्यापूर्वी तेथे हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. अमरावतीमध्ये हेल्मेटसक्ती कशी हाताळली जाते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
निर्णय हेल्मेट सक्तीचा : जनजागृती आवश्यक अपघात टाळण्यासाठी
जिल्ह्यात सर्वदूर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला. तर हजारोंना कायमचे जायबंदी व्हावे लागले. हेल्मेट असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. डोक्याला गंभीर इजा झाल्यानेही काही जण आयुष्याची लढाई लढत आहेत. हेल्मेट असल्यास अशा अपघातांना आळा बसतो. जीव वाचविण्यास हेल्मेट आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला मोठ्या आघातापासून वाचविण्यासाठी हेल्मेट नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे. सक्तीने प्रश्न सुटणार नाही
नैतिक जबाबदारी
जीवित हानी टाळण्यास हेल्मेटमुळे मदत होते. म्हणून राज्यभरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजाणी होणार आहे. शिवाय ती नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांना करून द्यावी लागेल. हेल्मेट वापरण्याकडे सक्ती नव्हे, तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज आहे. हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती महत्त्वाचे आहे. नागरिकांना सक्तीपेक्षा नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव करून देणे आवश्यक असताना त्यात आधी पोलिसांनीही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
अपघाताचे प्रचंड प्रमाण पाहता हेल्मेट सक्तीचा निर्णय स्तुत्य आहे. मात्र सक्ती करुन होणार नाही. हेल्मेट ही नैतिक जबाबदारी म्हणून अंगिकारणे महत्त्वाचे आहे.
- विजय काठोळे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे लागेल. त्यासाठी आधी जनजागृतीही तेवढीच आवश्यक आहे. हेल्मेट उपलब्धतेचाही विचार करावा लागेल.
- दत्तात्रेय मंडलिक,
पोलीस आयुक्त, अमरावती.