‘मिनिस्ट्री’ नव्हे, शेतकरी महत्त्वाचा

By Admin | Updated: February 16, 2015 00:15 IST2015-02-16T00:15:39+5:302015-02-16T00:15:39+5:30

नांदगावपेठ येथील औद्योगिक पंचतारांकित वसाहत परिसरात साकारण्यात आलेल्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय देताना लोकांच्या बाजुने उभा राहिल.

Not a 'ministry', a farmer is important | ‘मिनिस्ट्री’ नव्हे, शेतकरी महत्त्वाचा

‘मिनिस्ट्री’ नव्हे, शेतकरी महत्त्वाचा

अमरावती : नांदगावपेठ येथील औद्योगिक पंचतारांकित वसाहत परिसरात साकारण्यात आलेल्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय देताना लोकांच्या बाजुने उभा राहिल. मला ‘मिनिस्टरी’ नव्हे तर शेतकरी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी आयोजित आढावा बैठकीत ‘सोफिया’च्या अधिकाऱ्यांना खडसावले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, भाजपच्या नेत्या निवेदिता चौधरी, दिलीप निंभोरकर, सोफियाचे शरद किनकर, अनिल भटकर, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह एमआयडीसी, सोफियाचे अधिकारी उपस्थित होते. सोफियातील नोकरी संदर्भातील गाऱ्हाणी ऐकली.
२८५ आहेत प्रकल्पग्रस्त
नांदगाव पेठ, एमआयडीसीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात असे २८५ प्रकल्पग्रस्त असल्याची नोंद आहे. यात आतापर्यंत ११३ लोकांना नोकरी मिळाली आहे. ४२ जण त्रुटीत आहेत. ४० लोकांना आदेश दिले असून त्यांना १५ मार्चपर्यंत नियमानुसार सामावून घेतले जाणार. ९२ जणांनी अर्ज केले नाही. २० जणांना १० मार्चपर्यंत नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले जातील, असे सोफियाचे वरिष्ठ अधिकारी शरद किनकर यांनी सांगितले.

Web Title: Not a 'ministry', a farmer is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.