शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शहरात उघड्यावर निजणाऱ्या बेघरांना रात्रनिवाऱ्याचा ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 6:00 AM

विकासाकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या अमरावतीमध्ये कायमस्वरूपी बेघरांची समस्याही मोठी आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या आडोशाला किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर निद्रा पुरी करावी लागत आहे. अशा परिस्थितीतील वृद्ध व बालकांची आबाळ होते. त्यांच्या सुविधेकरिता दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अमरावती महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे आधार उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबडनेरा येथे उपक्रम । दिव्यांगांसह ४० जणांचा समावेश,

अमरावती : तुम्हाला एखादा बेघर रात्रीच्या सुमारास उघड्यावर निजलेला आढळला, तर त्याच्याबद्दल कणव व्यक्त करून पुढे जाऊ नका. त्याच्याजवळ जा आणि महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या बडनेरा येथील ‘आधार’ रात्र निवारा केंद्राचा पत्ता द्या. या रात्र निवारा केंद्रात ४० हून अधिक व्यक्ती रात्र घालवतात. त्यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे.विकासाकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या अमरावतीमध्ये कायमस्वरूपी बेघरांची समस्याही मोठी आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या आडोशाला किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर निद्रा पुरी करावी लागत आहे. अशा परिस्थितीतील वृद्ध व बालकांची आबाळ होते. त्यांच्या सुविधेकरिता दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अमरावती महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे आधार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरी निवारा केंद्र बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील चांदणी चौकात सुरू करण्यात आले आहे.शहरातील उघड्यावर झोपणाºया बेघर लोकांकरिता हे रात्र निवारा केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. या निवाऱ्यामध्ये राहण्याची, आंघोळीची, पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची आणि अपंग व वृद्ध व्यक्तींसाठी मोफत जेवणाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक ज्योती राठोड, व्यवस्थापक सुशीलदत्त बागडे, काळजीवाहक संजय धवने आदी यासाठी राबत आहेत.भिक्षेकऱ्यांना दाखवा वाटशहरातील बेघर, भिक्षेकरी यांना रस्त्यावर भिक्षा न देता नागरिकांनी रात्रनिवारा केंद्राचा रस्ता दाखवावा. संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते शहरात रात्री ९ ते १२.३० पर्यंत पेट्रोलिंगवर राहतात. ते स्वत: उघड्यावर निजणाºया व्यक्तींशी संवाद साधून केंद्रात आणतात. त्यांच्याशी संपर्क करून अशा व्यक्तींसदर्भात माहिती देता येईल, असे कळविण्यात आले आहे. या केंद्रात दिव्यांग व्यक्तीदेखील कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.भिक्षेकऱ्यांच्या संगोपनासाठी शहरातील दानदात्यांनी वस्तू, जुने वर्तमानपत्र, जुने कपडे वा पैशांच्या स्वरूपात देणगी द्यावी. याशिवाय आपल्या कुटुंबातील वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तेरवी, पुण्यतिथी आदी कार्यक्रम रात्र निवारा केंद्रावर येऊन बेघर लोकांसोबत साजरे करावेत.- राजू बसवनाथे, अध्यक्ष, पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी

टॅग्स :Badneraबडनेरा