कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:23+5:302021-05-30T04:11:23+5:30

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...

No one will go hungry; ration card holders will get grain! | कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा

अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्ड धारक

१९४०५७८

प्राधान्यगट- २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी ८००२८

बॉक्स

काय मिळणार?

प्रतिमानसी

३ किलो गहू

२ किलो तांदूळ

बीपीएलच्या -२८५७८२

सदस्यांना लाभ

१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्याना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड

२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू ,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.

३) केंद्र शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्याना मिळणार लाभ

केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे २०२० च्या अन्नधान्याचे मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार, जिल्ह्यातील सुमारे १९ लाखांवर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: No one will go hungry; ration card holders will get grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.