शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राज्यात वनवणवा नियंत्रणासाठी तोकडी यंत्रणा, निधीची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 16:03 IST

राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. आग विझविण्याचे प्रशिक्षण नसल्याने एका वनरक्षकाचा आगीत होरपळून जीव गेला आहे.सध्या आगीचा हंगाम सुरू झाल्याने वनविभाग अलर्ट झालेला आहे. सर्वाधिक आगीची भीती राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांना यासोबत प्रादेशिक वनविभागाच्या जंगलास आहे. गतवर्षी विदर्भातील वनक्षेत्रास लागलेल्या आगीत जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. यावर्षीसुद्धा वनविभागास वनक्षेत्रास लागणा-या आगीची चिंता आहे. त्यामुळे वनक्षेत्रामध्ये फायर लाईन कापणे व जाळण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असले तरी सदर कामास आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याचे वनविभागाची गोची झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वनक्षेत्रास लागणारी आग ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनवणव्याचे नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली असून विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांची समिती गठित असताना या समितीचा बोजवारा उडाला आहे. समितीला डी.पी.सी.डी.च्या फंडातून वनवणवा नियंत्रणाकरिता निधी देण्याचे धारिष्ट्य होत नाही. 

वाहनांचीही वानवाआग नियंत्रणासाठी उन्हाळ्याच्या हंगामात वनविभागास कोणत्याही विभागाची वाहने किंवा कर्मचारी बोलाविण्याचा अधिकार आहे. तसे अधिकार विभागीय आयुक्त व प्रादेशिक, परिवहन अधिका-यांना देण्यात आलेला असतानासुद्धा वनविभागास इतर विभागाची वाहने किंवा कर्मचारी उपलब्ध होत नाही.

वनरक्षकाचा बळीजुन्नुर येथे कार्यरत नागठाणे नामक वनरक्षक हे जंगलातील आग नियंत्रण करीत असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वनविभागाकडे पुरेसे ब्लोअर मशीन नसल्याने वनरक्षकांना पाण्याच्या सहाय्याने वनांतील आग नियंत्रित करावी लागते.

टॅग्स :fireआगAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र