शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सुसाट वाहनांचे आतापर्यंत नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:12 AM

फोटो - रस्त्याचा पाहतो. महामार्ग धोकादायक, जरुडात गतिरोधक बसविण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा जरूड : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत ...

फोटो - रस्त्याचा पाहतो.

महामार्ग धोकादायक, जरुडात गतिरोधक बसविण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा जरूड : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या लौकीकप्राप्त जरूड येथे सुसाट वाहनांचे नऊ बळी झाले आहेत. डाॅ. हेमा पाटील, जयवंत यावले, विठ्ठलराव धस, जयवांताबई खत्री, उत्क्रांती शाळेच्या बेनोडा येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. महामार्गावर हे अपघात झाले आहेत.

जरूड येथील बस स्थानकापुढून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. वरूड-अमरावती महामार्गावरील हे गाव २२ हजार लोकवस्तीचे आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बाळासाहेब देशमुख कन्या शाळा, जरूड हायस्कूल जरुड, विवेकानंद इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, शशिकलाबाई बोरकर प्राथमिक शाळा, कला वाणिज्य महाविद्यालय, उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आहेत. यात एकूण ३५०० विद्यार्थी दररोज शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना ८० फूट रुंदीचा महामार्ग आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. महामार्गाच्या नव्याने झालेल्या रुंदीकरणात लावलेल्या दुभाजकामुळे येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. येथे जर गतिरोधक बसविण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोशन दारोकर यांनी दिला आहे.

यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे गतिरोधक बसविण्यासाठी मोठे जनआंदोलन झाले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गावात तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. परंतु एचजी इन्फ्रा या कंपनीने केलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे पूर्वी असलेले गतिरोधक नाहीसे झाले. नवीन रस्त्यावरून अवैध वाहतूकदार वाहने सुसाट पळवितात, अशी विद्यार्थी, ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण प्रशासनाला मिळविता आलेले नाही. वाहतूक नियमन करण्यासाठी येथे उभे केलेले अधिकारी, कर्मचारी फक्त शोभेची वस्तू ठरले आहेत. गतिरोधक बसवण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार पत्रव्यवहार, विनंती करूनसुद्धा फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने जरूडकरांचे प्राण धोक्यात आले आहे.

-----------

जरूड हे तालुक्यातील मोठे गाव आहे. वरूड-अमरावती महामार्गावरच सर्व शाळा आहेत. या मार्गावर वाहतूक सुसाट असल्याने त्यांच्यावर नियंत्रणासाठी गतिरोधक आवश्यकच आहे. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

- किशोर गावंडे, तहसीलदार, वरूड

---------------

माझी पत्नी डॉ. हेमा पाटील यांना रस्ता अपघातात गमावले. त्यानंतर महत्प्रयासाने येथे गतिरोधक लागले. परंतु, महामार्ग निर्मितीत हे गतिरोधक नष्ट झाले. आता किती जणांचे प्राण गेल्यानंतर पुन्हा गतिरोधक बसविले जाणार आहे?

- डॉ. सुशील पाटील, जरूड