शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही - पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 22:32 IST

बोंड अळीने यावर्षी शेतक-यांची दाणादाण उडविली असली तरी कुठलाही रोग येणार नाही असे वाण पुढील वर्षी आणू. त्यामुळे बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी वरूड येथील राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या दुस-या दिवशी शुक्रवारी केले. 

 वरूड (अमरावती) - बोंड अळीने यावर्षी शेतक-यांची दाणादाण उडविली असली तरी कुठलाही रोग येणार नाही असे वाण पुढील वर्षी आणू. त्यामुळे बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी वरूड येथील राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या दुस-या दिवशी शुक्रवारी केले. 

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कृषिमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात बोंड अळीने १ लाख ६२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. मात्र, याबाबत चिंता करू नका, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. नुकसानाची भरपाई सुद्धा दिल्या जाईल. भारत कृषिप्रधान देश आहे. बदलत्या निसर्गामुळे शेतक-यांनीसुद्धा बदलण्याची गरज आहे. शेतकºयांचे उत्पन्न दुपटीने होण्यासाठी अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. मागणीनुसार ट्रॅक्टर दिल्या जाईल, ठिबक आणि तुषार योजना देऊ. बीटी बियाणे २००२ पासून आले. या बियाण्याचा कालावधी २००६ पर्यंत होता. त्यानंतर बीटी-२ आले. तरीही अळीचे प्रमाण वाढतच आहे. यावर पर्याय शोधून यापुढे रोगमुक्त नवीन वाण आणू. उमरखेड प्रकल्पाला मान्यता देऊन चालू करू. पॅक हाऊसचा कोटा कमी असल्याने तो जास्तीत जास्त करण्यात येईल. सोयाबीन पिकाचा विमा ज्या शेतकºयांनी काढला नसेल, त्यांनासुद्धा झालेल्या नुकसानीचा मोबदला देऊ, असे ते म्हणाले. मागील सरकारने शेतकºयांना १५ वर्षे वेठीस धरले. आता ते केवळ शेतकºयाच्या प्रश्नावर राजकारण करीत आहेत. शेतक-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही ना. फुंडकर यांनी उपस्थित शेतकºयांना दिली.

१५ वर्षात कामे झाली नाही, ३ वर्षात आम्ही करून दाखविले - प्रवीण पोटेमहाराष्ट्रा शासनाने ३६ हजार कोटींची कर्जमाफी केली. मागील काँग्रेस सरकारने १५ वर्षांत शेतकºयांना न्याय दिला नाही. परंतु, आम्ही तीन वर्षात शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. एम.आर.जी.एस.सह अनेक योजना राबविल्या, सोयाबीनचे भाव कमी झाले, हे आम्हाला मान्य आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतक-यांनी अधिक उत्पन्न घेतलेले आहेत. यामध्ये तुरीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. पाणंद रस्ते झाल्याने शेतक-यांचे आपसातील वाद मिटले. सिंचन प्रकल्पांसाठी ना. नितीन गडकरी यांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिल्याने कामे पूर्ण होईल. २०२४ पर्यंत शून्य टक्क्याने शेतक-यांना कर्ज देणार आहोत. एम.आर.जी.एस. अंतर्गत रोजगार देणार तसेच कुठल्याही आजारी व्यक्तीला १०० टक्के पूर्ण खर्च देऊ, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. व्यासपीठाचे संचालन आ. बोंडे यांनी केले.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती