शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:15 IST

Sharad Pawar On Ram Mandir: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.

Ram Mandir Ayodhya | अमरावती: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी सर्वत्र आनंदाचं वातावरण असून मंदीर ट्रस्टने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीला आमंत्रण दिले आहे. प्रभू श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होण्यापूर्वी राजकारणही तापू लागलं आहे. सत्ताधारी भाजपा या कार्यक्रमाचे श्रेय घेत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं. अयोध्येत राम मंदिर झालं याचा आनंद असल्याची भावनाही पवारांनी व्यक्त केली. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता", अशा शब्दांत पवारांनी भाजपाला टोला लगावला. तसेच तीन राज्यातील राज्याचा निकाल अपेक्षेमाणं लागला नाही. मात्र, 'इंडिया' आघाडीत लढलो असतो तर निकाल वेगळा लागू शकला असता. आगामी काळात देखील एकत्र लढल्यास यश मिळेल. प्रकाश आंबेडकरांनी 'इंडिया' आघाडीसोबत यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असेही शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. राजस्थानच्या जनतेनं आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला अन् भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवल्या. पण, छत्तीसगडच्या निकालानं राजकीय पंडितानांही धक्का बसला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसचा इथं पराभव झाला. लक्षणीय बाब म्हणजे या राज्यांमध्ये 'इंडिया' आघाडीचं गणित फसलं. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षानं काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते. याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला. त्यामुळं आगामी काळात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी 'इंडिया' आघाडीचा भाग होणार का हे पाहण्याजोगे असेल.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा