शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:15 IST

Sharad Pawar On Ram Mandir: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.

Ram Mandir Ayodhya | अमरावती: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी सर्वत्र आनंदाचं वातावरण असून मंदीर ट्रस्टने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीला आमंत्रण दिले आहे. प्रभू श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होण्यापूर्वी राजकारणही तापू लागलं आहे. सत्ताधारी भाजपा या कार्यक्रमाचे श्रेय घेत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं. अयोध्येत राम मंदिर झालं याचा आनंद असल्याची भावनाही पवारांनी व्यक्त केली. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता", अशा शब्दांत पवारांनी भाजपाला टोला लगावला. तसेच तीन राज्यातील राज्याचा निकाल अपेक्षेमाणं लागला नाही. मात्र, 'इंडिया' आघाडीत लढलो असतो तर निकाल वेगळा लागू शकला असता. आगामी काळात देखील एकत्र लढल्यास यश मिळेल. प्रकाश आंबेडकरांनी 'इंडिया' आघाडीसोबत यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असेही शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. राजस्थानच्या जनतेनं आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला अन् भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवल्या. पण, छत्तीसगडच्या निकालानं राजकीय पंडितानांही धक्का बसला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसचा इथं पराभव झाला. लक्षणीय बाब म्हणजे या राज्यांमध्ये 'इंडिया' आघाडीचं गणित फसलं. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षानं काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते. याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला. त्यामुळं आगामी काळात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी 'इंडिया' आघाडीचा भाग होणार का हे पाहण्याजोगे असेल.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा