शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

व-हाडाच्या कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:12 PM

विभागात खरिपाची ८० टक्के पेरणी झाली असली तरी कर्जवाटप मात्र २० टक्केच करण्यात आले आहे.

अमरावती : विभागात खरिपाची ८० टक्के पेरणी झाली असली तरी कर्जवाटप मात्र २० टक्केच करण्यात आले आहे. जिल्हा बँकांनी शासनाच्या तंबीनंतर सावध पवित्रा घेत ३१ टक्के वाटप केले. राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत १० टक्केच वाटप झालेले आहेत. बँकांच्या असहकारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.यंदाच्या हंगामात विभागातील पाचही जिल्ह्यांमधील बँकांना ८,२८३.६१ कोटींचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्या तुलनेत बँकांनी सोमवारपर्यंत २ लाख ५ हजार २२८ शेतक-यांना १,६१७ कोटी ५० लाखांचे कर्जवाटप केले. ही १९.५७ टक्केवारी आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा बँकांना २,२५६.३६ कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ७० हजार ६०४ शेतक-यांना १ लाख ७३ हजार ४८१ हेक्टरसाठी ७०६ कोटी ४ लाखांचे कर्जवाटप झालेले आहेत. ही ३१.२९ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक ६१.२८ टक्के कर्जवाटप बुलडाणा जिल्हा बँकेनी केलेले आहे. मात्र, अमरावती जिल्हा बँक सर्वाधिक माघारला आहे. या बँकेने आतापर्यंत फक्त २२.२० टक्केच कर्जवाटप केलेले आहे. अकोला जिल्हा बँक २०.५४, वाशिम जिल्हा बँक २३.४२, तर यवतमाळ जिल्हा बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ५८.९२ टक्के कर्जवाटप केलेले आहेत.यंदाच्या पीककर्ज वाटपात राष्टीयीकृत बँका माघारल्या. या बँकांना सर्वाधिक ५,२६० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ६० हजार ४५० खातेदारांना ५६५ कोटी ७० लाखांचे कर्ज वाटप केले. ही १०.७५ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक २४ टक्के वाटप यवतमाळ जिल्ह्यात झाले. तर सर्वात कमी ७ टक्के वाटप अकोला जिल्ह्यात झाले. अमरावती २१.१८ टक्के, वाशिम ७.४६ तर बुलडाना जिल्ह्यात १२.०९ टक्के कर्जवाटप करण्यात आले. ग्रामीण बँकांना ८२६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना ६ हजार ५५३ शेतक-यांना ५८.१० कोटींचे कर्जवोाप करण्यात आले. ही ७.७८ टक्केवारी आहे. शासन प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतक-यांचा सवाल आहे.पश्चिम विदर्भात कर्जवाटपाची सद्यस्थिती (लाखांत)जिल्हा हेक्टर खातेदार कर्जवाटप टक्केवारीअमरावती २५,८२६ ३४,५३२ ३५००१.९२ २१.४७अकोला ३५,३३८ २५,१२२ १९३५७.६८ १४.५०वाशिम ३०,११८ २३,२३८ १८३७५.६७ १२.४६बुलडाणा ६,२०१ २९,५०८ २२०९३.२९ १२.६६यवतमाळ ७६,००८ ९२,८२८ ६६९२२.०० ३२.२०एकूण १,७३,४६१ २,०५,२२८ १६१७५०.५६ १९.५७

टॅग्स :bankबँक