शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नसीम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:28 IST

पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

ठळक मुद्देपोहरा येथील बहुचर्चित प्रक रण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.विधी सूत्रानुसार, ३ सप्टेंबर २०१४ रोजी एका व्यक्तीला फे्रजरपुरा हद्दीतील जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासदरम्यान मृत व्यक्ती अब्दुल नसीम अब्दुल सत्तार असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी मोहम्मद नईमोद्दीन याने त्याचा मित्र वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल यांना बोलावून जावई अब्दुल नसीमला मारून टाकल्याचे पुढे आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करून त्यांच्यविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. सरकारी पक्षातर्फे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयात आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला नाही.असा झाला युक्तिवादआरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे सिद्ध होत आहेत. आरोपी मोहम्मद नईमोद्दीनकडे हत्या करण्याचा उद्देश होता, तो सिद्ध झाला. म्हणून आरोपींना शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तर घटनेच्या तारखेला आरोपी व मृतक हे एकमेकांच्या सोबत होते, हे सिद्ध झाले नाही. आरोपी मोहम्मद नईमोद्दीन यानेच मृतकाला दोन हॉटेल खरेदी करून दिले होते. ही बाब सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यात उलट तपासणीदरम्यान लक्षात आणून देण्यात आली. जर आरोपीने मृताला हॉटेल खरेदी करून दिले, तर त्याला मारण्याचे कोणतेही कारण नव्हते व इतर परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे सिद्ध झाले नाही, म्हणून आरोपींना निर्दोष सोडण्यात यावे, अशा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील परवेज खान यांनी केला.आरोपी मोहसिन कमाल हा मुंबईचा रहिवासी असून, त्याचे व मृतकाचे कोणतेच वाद नव्हते. तो मुंबईहून अमरावतीत आला, ही बाब सिद्ध झाली नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. नरेंद्र दुबे यांनी केला. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. परवेज खान यांना अनिल जयस्वाल, वसीम शेख व शहजाद शेख यांनी सहकार्य केले.