शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

बाळासाहेब, उद्धव यांच्यातील वाद झाकण्यासाठी नारायण राणेंनी शिवसेना सोडली, नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 20:03 IST

शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. 

अमरावती : शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. जुन्या कॉटन मार्केटनजीक एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये आ. नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आम्ही राणेसाहेबांचेच कार्यकर्ते आहोत. त्यांनी भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी जरी काँग्रेसचा आमदार असलोे तरी या पक्षाचे काही जण माझ्यावर कारवाईची प्रतीक्षा करीत आहेत. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राजीनामा देऊ. शिवसेनेसारखे राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही. योग्य वेळ आली की, समर्थकांचेही राजीनामे होतील, असा टोलाही महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे लगावला. राज्यात नारायण राणे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे.  म्हणूनच महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचा पक्ष झाला. मी पक्षाचे ट्रेलर घेऊन आलो असून, संपूर्ण पिक्चर १८ फेब्रुवारीला अमरावतीत आयोजित जाहीर सभेत राणेसाहेब स्पष्ट करणार आहेत. या सभेतून पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना मंत्री न केल्यास भाजपसोबत त्यांचा पक्ष मैत्रीपूर्ण संबध ठेवणार का, यासंदर्भात छेडले असता, त्यांनी सर्वच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ३९ वर्षे शिवसेनेत व दहा वर्षे काँग्रेसमध्ये ते होते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठीच त्यांचे नेतृत्व असल्याचे आ. नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते सिद्धार्थ वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रपरिषदेला आ. नितेश राणे दीड तास उशिरा येऊन पत्रकारांना ताटकळत ठेवले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Amravatiअमरावती