शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बाळासाहेब, उद्धव यांच्यातील वाद झाकण्यासाठी नारायण राणेंनी शिवसेना सोडली, नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 20:03 IST

शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. 

अमरावती : शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. जुन्या कॉटन मार्केटनजीक एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये आ. नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आम्ही राणेसाहेबांचेच कार्यकर्ते आहोत. त्यांनी भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी जरी काँग्रेसचा आमदार असलोे तरी या पक्षाचे काही जण माझ्यावर कारवाईची प्रतीक्षा करीत आहेत. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राजीनामा देऊ. शिवसेनेसारखे राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही. योग्य वेळ आली की, समर्थकांचेही राजीनामे होतील, असा टोलाही महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे लगावला. राज्यात नारायण राणे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे.  म्हणूनच महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचा पक्ष झाला. मी पक्षाचे ट्रेलर घेऊन आलो असून, संपूर्ण पिक्चर १८ फेब्रुवारीला अमरावतीत आयोजित जाहीर सभेत राणेसाहेब स्पष्ट करणार आहेत. या सभेतून पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना मंत्री न केल्यास भाजपसोबत त्यांचा पक्ष मैत्रीपूर्ण संबध ठेवणार का, यासंदर्भात छेडले असता, त्यांनी सर्वच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ३९ वर्षे शिवसेनेत व दहा वर्षे काँग्रेसमध्ये ते होते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठीच त्यांचे नेतृत्व असल्याचे आ. नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते सिद्धार्थ वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रपरिषदेला आ. नितेश राणे दीड तास उशिरा येऊन पत्रकारांना ताटकळत ठेवले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Amravatiअमरावती