शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बाळासाहेब, उद्धव यांच्यातील वाद झाकण्यासाठी नारायण राणेंनी शिवसेना सोडली, नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 20:03 IST

शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. 

अमरावती : शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला. जुन्या कॉटन मार्केटनजीक एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये आ. नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आम्ही राणेसाहेबांचेच कार्यकर्ते आहोत. त्यांनी भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी जरी काँग्रेसचा आमदार असलोे तरी या पक्षाचे काही जण माझ्यावर कारवाईची प्रतीक्षा करीत आहेत. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राजीनामा देऊ. शिवसेनेसारखे राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही. योग्य वेळ आली की, समर्थकांचेही राजीनामे होतील, असा टोलाही महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे लगावला. राज्यात नारायण राणे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे.  म्हणूनच महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचा पक्ष झाला. मी पक्षाचे ट्रेलर घेऊन आलो असून, संपूर्ण पिक्चर १८ फेब्रुवारीला अमरावतीत आयोजित जाहीर सभेत राणेसाहेब स्पष्ट करणार आहेत. या सभेतून पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना मंत्री न केल्यास भाजपसोबत त्यांचा पक्ष मैत्रीपूर्ण संबध ठेवणार का, यासंदर्भात छेडले असता, त्यांनी सर्वच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ३९ वर्षे शिवसेनेत व दहा वर्षे काँग्रेसमध्ये ते होते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठीच त्यांचे नेतृत्व असल्याचे आ. नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते सिद्धार्थ वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रपरिषदेला आ. नितेश राणे दीड तास उशिरा येऊन पत्रकारांना ताटकळत ठेवले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Amravatiअमरावती