शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

वातावरणीय बदलास राज्यात नंदूरबार सर्वाधिक संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:09 AM

वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे.

ठळक मुद्दे‘टेरी’चा अहवाल सन २०३० ते २०७० या कालावधीतील वातावरण बदलाचे शास्त्रीय अनुमान

गजानन मोहोड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे. यामध्ये सन १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी हवामान व तापमानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सन २०३० ते २०७० या कालखंडातील वातावरणीय बदलांचे शास्त्रोक्त अनुमान काढले आहे. यामध्ये वातावरणीय बदलास सर्वाधिक अतिसंवेदनशील निर्देशांकांत (व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे. असुरक्षिततेमध्ये जळगाव, संवेदनशीलमध्ये औरंगाबाद, तर अनुकूलनमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा प्रथमस्थानी आहे.जागतिक स्तरावरील वातावरणीय बदलाचे अनुमान महाराष्ट्र राज्यात जसेच्या तसे लागू होत नसल्याने राज्याची भौगोलिक स्थिती व स्थान लक्षात घेता शास्त्रोक्त अनुमान काढण्यात आले. यासाठी यु.के.मेट, टेरी यासंस्थांद्वारा रिजन क्लॉयमेट मॉडेलिंग सिस्टम व एचएडीआरएम३पी या दोन मॉडेलची निवड करून अनुमान काढण्याचे काम केले आहे. या अनुमानाची पडताळणी करण्यासाठी करण्यासाठी सन १०७० ते २००० या कालावधीतील राज्य शासनाच्या विविध विभागाकडची सांखिकी माहिती उपलब्ध करून देण्यात येऊन प्रक्षेपित अंदाजांची पडताळणी करण्यात आली व या अहवालानुसार राज्यातील विभागनिहाय तापमान व पर्जन्यमानातील होणाºया संभाव्य बदलाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्यात कमालपेक्षा किमान तापमानाचे सरासरी तापमान वाढणार आहे व यामुळेच पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होणार असल्याचे अनुमान नोंदविण्यात आलले आहे. या बदलास सामोरे जाताना महत्त्वाच्या १४ शिफारसी राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरणात करण्यात आलेल्या आहेत.फळपिकांवर कीड व रोग वाढणारसन २०३०, २०५० व २०७० या कालखंडात वाढते तापमान व आर्द्रतेमधील बदलामुळे डाळींब, द्राक्षे, केळी, आंबा व संत्रा या पिकांवर रोगराई वाढणार आहे. पिकांची तग धरण्याची क्षमता कमी होणार आहे. अनियमित पाऊस यासाठी पोषक राहणार असल्यामुळे सरासरी उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. रोगराईस पोषक वातावरणामुळे मलेरिया, डेंग्यू आजाराची क्षेत्रव्याप्ती वाढणार आहे. संभावित अतिवृष्टीमुळे लोकवस्तीवर विपरित परिणाम होईल. वाढणाºया उष्णतामानामुळे उर्जेची मागणी वाढणार आहे.वातावरणीय बदलास अतिसंवेदनशील प्रथम दहा जिल्हेअतिसंवेदनशील निर्देशांक- नंदूरबार, धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम गडचिरोली.संवेदनशील : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, नांदेड, अकोला, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअसुरक्षित : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अकोला, नंदूरबार, नाशिक, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअनुकूलन : सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, वर्धा, रायगड, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, भंडारा

टॅग्स :environmentवातावरण