शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 18:37 IST

देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने बेरोजगारी, शेतकरी हितासाठी पुढाकार घ्यावा

अमरावती : भारत अखंड राहावा, हिंदू- मुस्लीम एकत्र नांदावेत. दोन्ही समाजांनी धार्मिक तेढ टाळावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसजनांकडून स्वागत आहे. पण, याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे व्यक्त केली.

नाना पटोले यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प मेळाव्यात सोनिया गांधी यांनी ‘भारत जोडो’चे आवाहन केले आहे. देशात जातीय, धर्मांध व्यवस्था मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने भारताची बदनामी, नाचक्की होत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी त्यादिशेने प्रयत्न व्हावेत, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. नेमके त्याच दिशेने सरसंघचालक डॉ. भागवत यांनी वक्तव्य केले आहे.

त्यांच्या वक्तव्याचे निश्चितच स्वागत आहे. तथापि, याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी ताठ मानेने उभा राहिला पाहिजे. केंद्रीय व्यवस्था शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या मित्र उद्योजकांच्या बाजूने उभी होत आहे. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत