शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 18:37 IST

देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने बेरोजगारी, शेतकरी हितासाठी पुढाकार घ्यावा

अमरावती : भारत अखंड राहावा, हिंदू- मुस्लीम एकत्र नांदावेत. दोन्ही समाजांनी धार्मिक तेढ टाळावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसजनांकडून स्वागत आहे. पण, याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे व्यक्त केली.

नाना पटोले यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प मेळाव्यात सोनिया गांधी यांनी ‘भारत जोडो’चे आवाहन केले आहे. देशात जातीय, धर्मांध व्यवस्था मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने भारताची बदनामी, नाचक्की होत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी त्यादिशेने प्रयत्न व्हावेत, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. नेमके त्याच दिशेने सरसंघचालक डॉ. भागवत यांनी वक्तव्य केले आहे.

त्यांच्या वक्तव्याचे निश्चितच स्वागत आहे. तथापि, याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी ताठ मानेने उभा राहिला पाहिजे. केंद्रीय व्यवस्था शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या मित्र उद्योजकांच्या बाजूने उभी होत आहे. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत