शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 18:37 IST

देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने बेरोजगारी, शेतकरी हितासाठी पुढाकार घ्यावा

अमरावती : भारत अखंड राहावा, हिंदू- मुस्लीम एकत्र नांदावेत. दोन्ही समाजांनी धार्मिक तेढ टाळावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसजनांकडून स्वागत आहे. पण, याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे व्यक्त केली.

नाना पटोले यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प मेळाव्यात सोनिया गांधी यांनी ‘भारत जोडो’चे आवाहन केले आहे. देशात जातीय, धर्मांध व्यवस्था मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने भारताची बदनामी, नाचक्की होत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी त्यादिशेने प्रयत्न व्हावेत, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. नेमके त्याच दिशेने सरसंघचालक डॉ. भागवत यांनी वक्तव्य केले आहे.

त्यांच्या वक्तव्याचे निश्चितच स्वागत आहे. तथापि, याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी ताठ मानेने उभा राहिला पाहिजे. केंद्रीय व्यवस्था शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या मित्र उद्योजकांच्या बाजूने उभी होत आहे. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत