वरूडमधील चौकांना गावांचीच नावे!

By Admin | Updated: May 9, 2014 01:01 IST2014-05-09T01:01:38+5:302014-05-09T01:01:38+5:30

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेले ऐतिहासिक वरुड गाव आहे. पूर्वी वरदा खेटक म्हणजे आजचे वरुड. येथे प्राचीन मंदिरे आहेत. वरूडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चौकांना गावांची नावे देण्यात आली आहेत.

The names of villagers in the chowk | वरूडमधील चौकांना गावांचीच नावे!

वरूडमधील चौकांना गावांचीच नावे!

वरुड : हजारो वर्षांचा इतिहास लाभलेले ऐतिहासिक वरुड गाव आहे. पूर्वी वरदा खेटक म्हणजे आजचे वरुड. येथे प्राचीन मंदिरे आहेत. वरूडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चौकांना गावांची नावे देण्यात आली आहेत.
ब्रिटिशकाळात देशाच्या स्वातंत्र्य युद्धात हिरीरीने भाग घेणार्‍या स्वातंत्र्यवीरांची वरूड ही भूमी आहे. दीडशे वर्षांची साक्ष देणारी मराठी शाळा तर शेकडो वर्षांचे पोलीस ठाणे आहे. ब्रिटिशकालीन नगरपरिषद असून सर्वक्षेत्रात नावलौकिक मिळविणारे प्रतिभावंत येथे आहेत. यामुळे श्रमशक्ती, ज्ञानशक्ती, युवाशक्ती वास करीत असतानाच धनशक्तीसुद्धा मोठय़ा प्रमाणात वास करायला लागली. यामुळे धनाढय़ लोकांचे गाव म्हणून ख्याती आहे. येथील लोकसंख्या ६0 हजारांपेक्षा अधिक असून पूर्वीहा तालुका मध्यप्रांतात होता. परंतु येथील काही चौकांना आजही गावांच्या तर काही ठिकाणी प्रतिष्ठानांच्या नावानी ओळखले जाते.
या गावाला मध्यप्रदेशची सीमा लाभली आहे. तर नागपूर, वर्धा जिल्ह्याची सीमा असल्याने वरुड शहर एक व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. या गावाला चारही दिशेने रस्ते जुळले आहे.
राज्य महामार्ग क्र २४४, १0 येथून जातो. गावात अनेक चौक आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बैतुल, मुलताई, पांढुर्णा, नागपूर, वर्धा, अमरावतीकडे मार्गजातात. केंद्रस्थानी वरुड शहर आहे. शहरात मुख्य वर्दळीचा महात्मा गांधी चौक आहे. तो केदार चौक म्हणून परिचित आहे. मुलताईकडे जाणारा राज्य महामार्ग असून या चौकाला मुलताई चौक म्हणून तर पांढुर्णाकडे जाणारा मार्ग असल्याने येथील 'टी' पाईंटला पांढुर्णा चौक म्हणून ओळख आहे.
वर्धेकडे जाणार्‍या राजुराबाजार मार्गावर पूर्वीचा जकात नाका असल्याने राजुरा नाका म्हणून ओळख आहे. या चौकांचा शासकीय कागदोपत्रीसुध्दा याच नावाने उल्लेख केला जातो. येथे संत-महंतांसह समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी झाले. परंतु या चौकाला कुण्याही स्वातंत्र्यवीरांचे नाव देण्यात आले नाही. अनेकवेळा नामकरणाकरिता आंदोलनेही झालीत. परंतु चौकांचे नामकरण झाले नाही. तरीही नागरिकांच्या तोंडून त्या गावांच्या नावाचा उद्धार होतो. टपालीचे पत्तेसुध्दा याच नावाने टाकले जातात. यामुळे चौकांना गावाची नांो असलेले वरुड असे एकमेव शहर आहे.

Web Title: The names of villagers in the chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.