शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
7
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
9
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
10
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
12
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
13
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
14
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
15
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
16
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
17
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
18
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
19
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी

By admin | Updated: December 10, 2014 22:49 IST

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक

अमरावती : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक उपक्रमाचे भरभरुन कौतुक करावे तेवढे कमी आहे. मात्र नऊ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोई सुविधांची जबाबदारी हाताळणाऱ्या महापालिकेतील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आल्यामुळे कोणाकडे कैफियत मांडावी, हा प्रश्न नगरसेवकांपुढे उपस्थित झाला होता, हे विशेष.
जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करुन गावात निर्माण झालेल्या समस्यांवर आकलन करुन त्यावर उपाययोजना म्हणून हे अधिकारी गावात मुक्काम करणार आहेत. परंतु महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची एकाच वेळी या कामी नियुक्ती करण्यामागील कारण काय? याबाबत चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. प्रशासकीय कामांचे नियोजन करावयाचे झाल्यास वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी हे आवश्यक राहतात. मात्र महापालिकेत अतिमहत्त्वाच्या विभाग सेवेतील अधिकाऱ्यांचीदेखील गाव मुक्कामी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरात आग, आरोग्य किंवा अतिक्रमणासारखी एखादी गंभीर समस्या उदभ्वल्यास ती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करावी, हा सवाल महापालिका आयुक्तांसमोर काही काळ निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी हा अभिनव उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना गाव मुक्कामी पाठविले. तर दुसरीकडे प्रमुख अधिकारीच दालनात नसल्याने समस्या, प्रश्न घेऊन महापालिकेत आलेल्या लोकप्रतिनिधींना आल्या पावली परतण्याचा प्रसंग ओढवला. महापालिकेत बुधवारी जवळपास महत्त्वाचे कक्ष हे अधिकाऱ्यांविनाच सुरु होते. प्रमुख अधिकारी नसल्याने कर्मचारीही कार्यालयात दांडी मारताना दिसून आले. (प्रतिनिधी)