शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांची कसरत, एपीसीएफची नियमांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:04 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे.

अमरावती - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. हा अफलातून प्रकार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) यांच्या निर्णयामुळे झाला आहे.शासन निर्णय सन २०१४ नुसार एमपीएसीतून निवडलेल्या वनपरिक्षेत्रपालांना १८ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून तसे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर विभागात त्या पदावर जबाबदारी नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, एपीसीसीएफ ए.आर. मंडे यांनी शासन नियमांचे धिंडवडे काढलेत. एमपीएसीतून निवडलेल्या १४६ आरएफओंपैकी ९० जणांना मोक्याच्या जागी नियुक्ती देण्याचा प्रकार चालविला आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्तव्याची जबाबदारी देऊ नये, असे शासन आदेश आहे. तथापि, एपीसीसीएफ मंडे यांनी वनविभागाचे सामान्य प्रशासन हे खासगी मालकी म्हणून कारभार चालविला आहे. प्रशिक्षणविना आरएफओंना थेट पोस्टींग याबाबत तत्काली मुख्यवनसंरक्षक  भगवान यांनी नाराजी व्यक्त केली होती, हे विशेष.

आयएफएस लॉबी हैराणनागपूर वनबल येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) ए.आर. मंडे यांच्या एककल्ली कारभारामुळे राज्यातील इतर भारतीय वन सेवा (आयएफएस) लॉबी हैराण झाल्याचे बोलले जात आहे. सामान्य प्रशासन हा विभाग अतिमहत्त्वाचा असल्याने येथे चौफेर विचारशील अधिकारी असणे अनिवार्य आहे. परंतु, एपीसीसीएफ मंडे हे सामान्य वनकर्मचाºयांचे प्रश्न, समस्या सोडवित नाही. त्यांच्या एकाकी निर्णयामुळे वनविभागाची बदनामी होत असल्याने आयएफएस लॉबी त्रस्त झाली आहे.

वनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नती केव्हावनपाल ते वनक्षेत्रालांना पदोन्नती देण्यासंदर्भात वरिष्ठ वनाधिकाºयांची बैठक (डीपीसी) आॅक्टोंबर २०१७ मध्ये होणे आवश्यक होते. आता मार्च २०१८ मध्ये डीपीसी होते किंवा नाही?  याबाबत साशंकता आहे. डीपीसी झाल्याशिवाय रिक्त पदे, सरळसेवेची पदे आणि न भरलेली पदे यांचा ताळमेळ बसविता येणार नाही. असे असतानासुद्धा एपीसीसीएफ मंडे यांनी त्याकरिता कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वनपालांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होत आहे.

आरएफओंच्या नोंदवहीत घोळ एमपीएससीमार्फत निवडलेल्या वनक्षेत्रपालांनी परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्यापेक्षा नियुक्तीच्या घिकाणी खुर्चीला चिटकून आहेत. परंतु प्रशिक्षणाचा १८ महिन्यांचा कालावधी दर्शविताना दैंनदिन कामे आणि परीविक्षाधीन कार्य जुळवून दाखवित असल्याने नोंदवहीत प्रचंड घोळ सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावती