शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांची कसरत, एपीसीएफची नियमांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:04 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे.

अमरावती - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. हा अफलातून प्रकार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) यांच्या निर्णयामुळे झाला आहे.शासन निर्णय सन २०१४ नुसार एमपीएसीतून निवडलेल्या वनपरिक्षेत्रपालांना १८ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून तसे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर विभागात त्या पदावर जबाबदारी नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, एपीसीसीएफ ए.आर. मंडे यांनी शासन नियमांचे धिंडवडे काढलेत. एमपीएसीतून निवडलेल्या १४६ आरएफओंपैकी ९० जणांना मोक्याच्या जागी नियुक्ती देण्याचा प्रकार चालविला आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्तव्याची जबाबदारी देऊ नये, असे शासन आदेश आहे. तथापि, एपीसीसीएफ मंडे यांनी वनविभागाचे सामान्य प्रशासन हे खासगी मालकी म्हणून कारभार चालविला आहे. प्रशिक्षणविना आरएफओंना थेट पोस्टींग याबाबत तत्काली मुख्यवनसंरक्षक  भगवान यांनी नाराजी व्यक्त केली होती, हे विशेष.

आयएफएस लॉबी हैराणनागपूर वनबल येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) ए.आर. मंडे यांच्या एककल्ली कारभारामुळे राज्यातील इतर भारतीय वन सेवा (आयएफएस) लॉबी हैराण झाल्याचे बोलले जात आहे. सामान्य प्रशासन हा विभाग अतिमहत्त्वाचा असल्याने येथे चौफेर विचारशील अधिकारी असणे अनिवार्य आहे. परंतु, एपीसीसीएफ मंडे हे सामान्य वनकर्मचाºयांचे प्रश्न, समस्या सोडवित नाही. त्यांच्या एकाकी निर्णयामुळे वनविभागाची बदनामी होत असल्याने आयएफएस लॉबी त्रस्त झाली आहे.

वनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नती केव्हावनपाल ते वनक्षेत्रालांना पदोन्नती देण्यासंदर्भात वरिष्ठ वनाधिकाºयांची बैठक (डीपीसी) आॅक्टोंबर २०१७ मध्ये होणे आवश्यक होते. आता मार्च २०१८ मध्ये डीपीसी होते किंवा नाही?  याबाबत साशंकता आहे. डीपीसी झाल्याशिवाय रिक्त पदे, सरळसेवेची पदे आणि न भरलेली पदे यांचा ताळमेळ बसविता येणार नाही. असे असतानासुद्धा एपीसीसीएफ मंडे यांनी त्याकरिता कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वनपालांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होत आहे.

आरएफओंच्या नोंदवहीत घोळ एमपीएससीमार्फत निवडलेल्या वनक्षेत्रपालांनी परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्यापेक्षा नियुक्तीच्या घिकाणी खुर्चीला चिटकून आहेत. परंतु प्रशिक्षणाचा १८ महिन्यांचा कालावधी दर्शविताना दैंनदिन कामे आणि परीविक्षाधीन कार्य जुळवून दाखवित असल्याने नोंदवहीत प्रचंड घोळ सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावती