शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन; खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 18:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले.

ठळक मुद्देपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपशहरात तणावाचं वातावरण

अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यावरुन नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा सधला आहे.

पुतळा हटविल्यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. खासदार नवनीत राणादेखील चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारेही लावले. लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि आदर्शांचा विसर पडलाय का? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुतळा हटविल्यानंतर, संतप्त कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, "सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली."

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप

जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर, त्यांना निवडणुकीत शिवप्रेमी जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.

महापालिका आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन

राजापेठ उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या कार्यवाहीचा निषेध म्हणून स्वराज्य सामाजिक संघटनेच्यावतीने स्थानिक ईर्विन चौकात महापालिका आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अमोल ईंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

महापालिकेला विशेष सभा घेण्याची केली होती मागणी

राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसविण्यात आला होता. तीन वर्षांपासून तेथे शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी होती. ही मागणी शिवप्रेमी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्ण केली असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. गेल्या तीन दिवसांपासून तेथे शहरातील शिवप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. तो पुतळा कायमस्वरूपी तेथेच ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या बहाल करण्याची मागणी आमदार राणा यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

दरम्यान, १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, यासाठी कोणतीच परवानगी न घेतल्यामुळे हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी जमली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजYashomati Thakurयशोमती ठाकूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे