शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही, ते कधी घराबाहेर पडले नाही'; अनिल बोंडे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:52 IST

खासदार अनिल बोंडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी, अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील हिंगोलीतल्या निर्धार सभेत केली. शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. तीच गत इतर मालांचीही आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. 

चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपामध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याचदरम्यान, उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून वाईट वाटलं, असं वक्तव्य भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. 

अनिल बोंडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही आणि सांभाळताही आला नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरे सध्या सोनिया गांधींच्या विचारावर बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण जपला. सध्याचे सरकार गोरगरिबांच्या घरी जाऊन योजना देता येतं. उद्धव ठाकरे कधी घराबाहेर पडले नाहीत. ठाकरेंनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सरकार चालवलं. त्यामुळे त्यांना त्याची किंमत कशी कळणार?, असा सवालही अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा देशासाठी काम करावं लागतं. त्यानंतर पक्षासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला देखील भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा भरवलेली-

काल हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर येत आहेत. आमदार संतोष बांगर यांनीही प्रत्युत्तर दिले. संतोष बांगर म्हणाले, जमा केलेली लोक एकनिष्ठ नाहीत. जिल्हा प्रमुखांनी अनेक पक्ष बदलली आहेत. उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा गोळा केली होती. या लोकांच्यामुळे आमच्या शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही, असं प्रत्युत्तर आमदार बांगर यांनी दिलं. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम राज्यातील जनता पाहत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सत्तेत राष्ट्रवादीसोबत बसलो. पण राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सहभागी झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले, उद्धव ठाकरेंनी आमच्या कावड यात्रेतील गर्दी पहावी. त्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवून ही ताकद कुणाची हे सांगावे, असं आवाहनही बांगर यांनी केलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Bondeअनिल बोंडेHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदे