वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:04+5:302021-02-13T04:14:04+5:30
अंजनगाव सुर्जी : महावितरणकडून थकीत वीजग्राहकांचे कनेक्शन कापण्यात येत आहे. महावितरणच्या या धोरणाविरुद्ध अंजनगाव सुर्जी तालुका मनसेच्यावतीने स्थानिक अधिकाऱ्यांना ...

वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन
अंजनगाव सुर्जी : महावितरणकडून थकीत वीजग्राहकांचे कनेक्शन कापण्यात येत आहे. महावितरणच्या या धोरणाविरुद्ध अंजनगाव सुर्जी तालुका मनसेच्यावतीने स्थानिक अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सहा सात महिन्यांतील वीजबिल भरून घेण्यासाठी वीजग्राहकांची वीजजोडणी खंडित करू नये, बळजबरीने वीजजोडणी कापल्यास मनसे आंदोलन करेल, त्याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कार्यालयाची राहील, असे निवेदन राजेंद्र गायगोले यांच्या मार्गदर्शनात येथील वीज अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी नितीन चौखंडे, सुधाकर फुलंबरकर, तेजस पेटे, मनोज मंडवे, देवेंद्र हाडोळे, संजय वानखडे, रतन शिंगणे, अभिजीत देशमुख, कपिल ढोक, मारोती बाळापुरे, गौरव काळमेघ, अजय लांबट, गोलू सगणे, अनिकेत सिरसाम, शिवाजी मोरे, संदीप घटाळे, निखिल गोळे, अंकित गाडगे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.