शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 16:01 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे.

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच मुसळधार पावसाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. चांदुर बाजार तालुक्यात घर कोसळून माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे आज (दि. १९) सकाळी पाच वाजताच्या सुमारास अरुण नारायण वैराळे यांचे घर पावसाने कोसळल्याने त्यात पत्नी चंदा अरुण वैराळे (३५), मुलगी पायल वैराळे (७) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर नारायण वैराळे, अरुण वैराळे,ओम वैराळे(१०) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्तुल व ठाणेदार सुनील किणगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात घरातील पाचही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र यात माय लेकीचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बच्चू कडूंची भेट; ५० हजारांची मदत

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फुबगाव गाठले. यावेळी त्यांनी स्वतः ५० हजारांची मदत देऊन वऱ्हाडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्री सहायता निधीतून वऱ्हाडे कुटुंबाला पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कुटुंबाला तत्काळ घर बांधून देण्यात आहे. याबाबत अधिक मदतीकरिता प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAccidentअपघातAmravatiअमरावतीRainपाऊस