शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा 78 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात २ सप्टेंबर रोजी ७८ टक्के जलसंचय झाला आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळल्यास धरण १०० टक्के भरून सर्व १३ दरवाजे उघडू शकतात. या नयनरम्य दृश्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे आणि हा योग आतापर्यंत जुळून न आल्याने त्यांचा हिरमोडदेखील झाला आहे. राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी आहे. २ सप्टेंबर २०२१ पर्यंत या धरणामध्ये ३४१.१०   मीटर पाणी असून, या  धरणामध्ये सध्या ७८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणामध्ये ४३४.४१ दलघमी पाणीसाठा आहे. जुलै-ऑगस्ट हे दोन महिने पावसाचे महत्त्वाचे महिने म्हणून समजले जाते. याच महिन्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण भरेल, अशी शक्यता असते. परंतु, जुलै महिना पूर्णतः कोरडा गेला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु, अप्पर वर्धा धरण  क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याचा येवा कमी झालेला आहे. 

चार दिवसांपासून पाऊसजिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुठले धरण शंभर टक्के भरले, कोणते धरण ओव्हरफ्लो झाले, हे पाहण्याची नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. यासंदर्भात अनेकजण फोनद्वारा विचारत आहेत.

गतवर्षी २ सप्टेंबरला ९२ टक्के जलसाठा धरण क्षेत्रामध्ये आजपर्यंत एकूण ५४५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गतवर्षी याच तारखेला अप्पर वर्धा धरण ९२ टक्के  भरले होते. त्यामुळे नागरिक, विशेषत: पवसाळी पर्यटनासाठी दुचाकी काढताच अप्पर वर्धा गाठणारे या धरणाकडे टक लावून बसले आहेत. 

 

टॅग्स :DamधरणRainपाऊस