शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

खरीप विम्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ ...

ठळक मुद्देदीड लाख हेक्टर संरक्षित : ८२५६२ गैरकर्जदार, ३९५६२ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ दिली. दुष्काळाच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे किमान पिकांना आपत्तीच्या काळात संरक्षण मिळून आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यातील १ लाख २२ हजार २२४ शेतकऱ्यांनी ३१ जुलै या अखेरच्या दिवसापर्यंत किमान दीड लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला आहे. भरपाईसाठी विमा कंपन्यांच्या अनुभव फारसा चांगला नसल्याने निम्म्या शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली असल्याचे वास्तव आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास पीक संरक्षण, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकºयांना नावीन्यपूर्व व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हे या योजनेचे उद्देश असले तरी मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव विपरीतच आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ या हंगामात १ लाख ५४ हजार ४९३ शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार ३९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला. प्रत्यक्षात यासाठी ४७ कोटी ७ लाख ३ हजारांचा हप्तादेखील भरणा केला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व १३ तालुक्यांची पैसेवारी ही ४६ राहिली. तरीही विमा कंपन्यांद्वारे फक्त ८,४४४ शेतकऱ्यांना ६ कोटी ६४ लाख ५८ हजारांची भरपाई मिळाली.प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी यावेळी २४ जुलै ही अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनसह आॅनलाइन सातबारा मिळण्यात येणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे पाच दिवसांची म्हणजेच २९ जुलै व नंतर ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळघार पाऊस होत असल्याने मुदतवाढीचा फारसा फायदा शेतकºयांना झालेला नाही.पीक विमा योजनेसाठी नुकसानभरपाई ही विमा क्षेत्र घटकातील कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. एखाद्या निर्धारित क्षेत्रात संबंधित पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल, अशी जाहिरात कृषी विभागासह विमा कंपन्या करीत आहेत. प्रत्यक्षात शेतकºयांचा अनुभव मात्र त्याच्या विपरीत आहे. तालुका घटक गृहीत न धरता संबंधित गावक्षेत्रातील सरासरी उत्पन्नावर शेतकºयांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा