शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

खरीप विम्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ ...

ठळक मुद्देदीड लाख हेक्टर संरक्षित : ८२५६२ गैरकर्जदार, ३९५६२ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ दिली. दुष्काळाच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे किमान पिकांना आपत्तीच्या काळात संरक्षण मिळून आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यातील १ लाख २२ हजार २२४ शेतकऱ्यांनी ३१ जुलै या अखेरच्या दिवसापर्यंत किमान दीड लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला आहे. भरपाईसाठी विमा कंपन्यांच्या अनुभव फारसा चांगला नसल्याने निम्म्या शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली असल्याचे वास्तव आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास पीक संरक्षण, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकºयांना नावीन्यपूर्व व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हे या योजनेचे उद्देश असले तरी मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव विपरीतच आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ या हंगामात १ लाख ५४ हजार ४९३ शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार ३९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला. प्रत्यक्षात यासाठी ४७ कोटी ७ लाख ३ हजारांचा हप्तादेखील भरणा केला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व १३ तालुक्यांची पैसेवारी ही ४६ राहिली. तरीही विमा कंपन्यांद्वारे फक्त ८,४४४ शेतकऱ्यांना ६ कोटी ६४ लाख ५८ हजारांची भरपाई मिळाली.प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी यावेळी २४ जुलै ही अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनसह आॅनलाइन सातबारा मिळण्यात येणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे पाच दिवसांची म्हणजेच २९ जुलै व नंतर ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळघार पाऊस होत असल्याने मुदतवाढीचा फारसा फायदा शेतकºयांना झालेला नाही.पीक विमा योजनेसाठी नुकसानभरपाई ही विमा क्षेत्र घटकातील कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. एखाद्या निर्धारित क्षेत्रात संबंधित पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल, अशी जाहिरात कृषी विभागासह विमा कंपन्या करीत आहेत. प्रत्यक्षात शेतकºयांचा अनुभव मात्र त्याच्या विपरीत आहे. तालुका घटक गृहीत न धरता संबंधित गावक्षेत्रातील सरासरी उत्पन्नावर शेतकºयांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा