शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पाऊस लांबल्यामुळे ‘मान्सून सूचक’ धोक्यात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:09 IST

मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

ठळक मुद्देमृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे.मुख्य ‘मृगाचा काळा कीडा’ व ‘गोसावी’ यंदा दृष्टीस पडला नाही. दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

अमरावती - मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुख्य ‘मृगाचा काळा कीडा’ व ‘गोसावी’ यंदा दृष्टीस पडला नाही. त्याचवेळी गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

मृगाची सुरुवात होताच ग्रामीण भागात ‘काळा कीडा’ दिसतो. त्यावरून मृगाच्या पावसाचे संकेत शेतकऱ्यांना मिळतात. अवकाळी पाऊस व मृगाचा पाऊस यातील फरक या कीटकसृष्टीच्या अस्तित्वातून सहज लक्षात येतो. मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा, भगव्या रंगाचा अन् धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल करून बसणारा मखमली ‘रेड वेल्वेट माईट’ यंदा दृष्टीस पडला नाही. ग्रामीण भागात त्याला ‘गोसावी’ किंवा ‘साधू’ नावानेही ओळखले जाते. विशेषत: विदर्भात त्याला ‘राणी ‘कीडा’ देखील म्हटले जाते. पावसाळ्यात ओल्या मातीवर चालणारा हा कीटक त्यानंतर केवळ चार महिने दिसतो आणि नंतर सुप्तावस्थेत जातो.

कृषी-परिस्थितीमध्ये वाढते रसायन व औषधामुळे अनेक सूक्ष्मजीव व कीटकांचे जीवन धोक्यात सापडले आहे. काही वर्षात शेतीत रासायनिक खाते व कीटकनाशके यांचा वाढता वापर यांच्या जीवावर बेतत आहे. पहिल्या पावसानंतर शेती व जंगल परिसरात गोसावी आढळून येतो. हा कीटक अतिशय संवेदनशील असून धोक्याचा स्पर्श होताच एकदम निर्जीव होऊन शांत बसतो. जणू काही मेलाच की काय, असे भासवतो. कुजलेल्या पानाचे बारीक कण व लहान सूक्ष्मजीव याचे मुख्य खाद्य आहे. याचे आयुष्य अवघे चार महिन्यांचे असते. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्व असणारे हे कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतीसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी हा धोकादायक नसून, हा पूर्णत: निरूपद्रवी आहे. काही वर्षांत याची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. 

निसर्ग अन्नसाखळी असुरक्षित

परिसंस्थेतील अन्नजाळ्यात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कीटक हे पक्षी, साप, सरडे यांचे मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला असल्याची बाब अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पाऊस लांबला की सूक्ष्मजीवांचे संवर्धन होत नाही. पिकांसोबत मैत्रीचे नाते सूक्ष्मजीवांचे असून, ते कमी होत असल्याने पिकांची वाठ खुंटते. हवामानाच्या आद्रतेवरीही परिणाम होतो. पावसाळात भूतलावर येणारे सूक्ष्मजीव हे शेतकऱ्यांचे मित्र असतात.

- एन. व्ही. फिरके, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस