पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

By Admin | Updated: February 8, 2016 00:18 IST2016-02-08T00:18:21+5:302016-02-08T00:18:21+5:30

सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत.

Money and dissatisfaction, same disabilities | पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

प्रबोधक प्रल्हाद पै : वझ्झर मतिमंद बालगृहात ‘मोगरा फुलला’
परतवाडा : सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत. या आश्रमातील मतिमंद मुले त्यांंच्याजवळ शंकरबाबांसारखे वडील असल्याने खरोखरच सुखी आहेत. मनुष्याने एक विचार धरला की तो आकार घेतो आणि येथे त्याचे मूर्तीमंत उदाहरण मला बघायला मिळाल, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी व्यक्त केले.
त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता वझ्झर येथे स्व. अंबादासपंत मतिमंद व अनाथ बालसुधारगृहाला भेट दिली. यावेळी अनाथांचे वडिल शंकरबाबा पापळकर, धनंजय नाकील, संतोश नरेडी, मल्हाराचे सरपंच मनोहर जाधव, जीवन रेड्डी, जीवनविद्या मिशनचे नामदारी, शसम, वाघमारे पारडे, तुषार राणे, संजय भागवत, देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अनाथ, अपंग, अंध व मतिमंद बालसुधार गृहाला भेट दिल्यावर आपण स्तब्घ झालो . हे काम एवढे सोपे नाही, हे काम येथे सगळ्यांनी येऊन पाहायला हवे, असेही पै पुढे म्हणाले. १८ वर्षानंतर या मुलांसाठी कुठलाच पुनवर्सनाचा कायदा नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रल्हाद पै पुढे म्हणाले.
बाबा म्हणाले २८ नातवंडे झालीत
१८ वर्षानंतर या अंध-अपंग मतिमंदांचे काय? याबाबत काही तरी कायदा व्हावा, ही लढाई मागील १८ वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शासनाला निर्देश दिले आहेत.पुनर्वसनाचा कायदा नझाल्यास नाहीतर रस्त्यावरून उचलून आणलेली ही माझी मुले १८ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावरच भरटकणार आहे. याला जबाबदार कोण?, असा खडा सवाल शंकरबाबांनी यावेळी केला. आतापर्यंत १८ मुला-मुलींची लग्ने झाले असून २८ नातवंडे झाली आहेत. दरवर्षी देशातील ५ लक्ष मुली कोठे जाता याचा पत्ता नाही. साडेतीन लक्ष अंध मुलांची माहिती नाही.

Web Title: Money and dissatisfaction, same disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.